शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

मी संसदेची चेष्टा केली नाही

By admin | Updated: September 9, 2014 01:14 IST

आतंकवादी हाफिज सईदला भेटलो म्हणून काँग्रेसच्या दोन खासदारांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मी जे कार्य करतो आहे ते राष्ट्रासाठी करतो आहे. हाफिज सईदला भेटण्यामागेही

वेदप्रताप वैदिक : आतंकवाद्यांशी वारंवार भेटीलनागपूूर : आतंकवादी हाफिज सईदला भेटलो म्हणून काँग्रेसच्या दोन खासदारांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मी जे कार्य करतो आहे ते राष्ट्रासाठी करतो आहे. हाफिज सईदला भेटण्यामागेही माझा उद्देश राष्ट्रहिताचा होता. असे असतानाही माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदारांनी केली होती. दोनच काय, तर अख्ख्या संसदेने एकमताने हा प्रस्ताव संमत केला तरीही मी मागे हटणार नाही. दोघांच्या मागणीवर जर अख्खी संसद भरकटणार असेल व माझ्यावर कारवाई करणार असेल, तर दुर्दैव आहे. मी संसदेचा सन्मान करतो. मला गर्व आहे. त्यामुळे मी संसदेची कुठलीही कुचेष्टा केली नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार व कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे चेअरमन डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी दिली.श्रमिक पत्रकार संघाच्या मीट द प्रेस कार्यक्रमात डॉ. वैदिक बोलत होते. वैदिक यांनी काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला होता. काश्मीरसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, भारतव्याप्त व पाकव्याप्त असे काश्मीरचे दोन भाग झाले आहे. भारताने जी स्वायत्तता काश्मीरला दिली आहे. तशीच पाकिस्तानव्याप्त असलेल्या काश्मीरला द्यावी. दोन्ही भागातील नागरिकांना स्वतंत्र वावरता आले पाहिजे. आपण देशाचे नागरिक आहोत, ही भावना येथील लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे वैदिक म्हणाले. जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्याशी झालेल्या भेटीमुळे माझ्यावर आरोप झालेत. या भेटीमागे माझी भूमिका राष्ट्रहिताची होती. मी हाफिज सईदला चांगल्या उद्देशाने भेटलो. त्याचे मनपरिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न होता. यापूर्वीही अनेक दशहतवाद्यांना मी भेटलो आहे. त्यामागची माझी भावना राष्ट्रहिताचीच होती. त्यांना सरकारच्या प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न होता. मात्र माझ्यावर जे आरोप झालेत, त्यामुळे माझ्या प्रमाणिकपणावर आघात झाला आहे. असे आरोप होतच राहतील, मात्र माझ्या भेटीतून राष्ट्रहित साधत असेल, तर यापुढेही अशा लोकांशी भेटण्याला मला काहीच हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भासाठी एकत्रित लढ्याची गरजलहान राज्यामुळेच त्या-त्या भागाचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होत असतो. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन योग्यच आहे. मात्र ही आंदोलने विखुरलेल्या अवस्थेत आहेत. विदर्भाची मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर त्यासाठी एकत्रित लढाच गरजेचा आहे. विदर्भाच्या समर्थनासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांचे प्रतिनिधी मंडळ तयार करा, अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना एकत्र आणा व या सर्वांची महासमिती तयार करा. पंतप्रधानांना ही महासमिती भेटत असेल, तर मी त्यात राहील. देशाचे पंतप्रधान आत्मविश्वासाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते नक्कीच विदर्भ देतील. त्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. २०१९ पर्यंत हा दबाव कायम ठेवल्यास, नक्कीच विदर्भ वेगळा होईल, अशी अपेक्षा वैदिक यांनी व्यक्त केली.