शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:49 IST

आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या कारणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केलेली असताना राज ठाकरे यांनीही अप्रत्यक्षपणे गुजरातला प्रकल्प जाण्यावरून नाराजी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातो याचे वाईट वाटते. पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य समान असली पाहिजे असं राज यांनी म्हटलं होते. 

राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं की, पंतप्रधान सगळ्या राज्यांना समान वागणूक देतात. आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे. मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात परंतु आपल्या राज्यातून बाहेर प्रकल्प जाऊ नये ही आपली जबाबदारी आहे. ती आपण पाळू अशी ग्वाही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात दिली. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?पंतप्रधान हे देशाचे आहे. देशाच्या बाबतीत त्यांना सर्व राज्य एकसमान असली पाहिजेत. उद्या महाराष्ट्रातील हा प्रकल्प आसामला गेला असता तर मला वाईट नसते वाटले. गुजरात देशातच आहे. परंतु जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यात संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांनी विशाल विचार करायला हवा असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवालमहाराष्ट्रातील प्रकल्प आणि बाहेर जाणारे प्रकल्प याबाबत चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. आतापर्यंतचे जे प्रकल्प राज्याबाहेर केले आहेत, त्या सर्वांना महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप म्हणजेच रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. गुंतवणुकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र करणारच असा ठाम निश्चय व्यक्त करताना, ३ लाख कोटींवर गुंतवणूक तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार, तर ५ लाख लोकांना इतर रोजगार मिळणारा रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी