शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:49 IST

आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या कारणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केलेली असताना राज ठाकरे यांनीही अप्रत्यक्षपणे गुजरातला प्रकल्प जाण्यावरून नाराजी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातो याचे वाईट वाटते. पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य समान असली पाहिजे असं राज यांनी म्हटलं होते. 

राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं की, पंतप्रधान सगळ्या राज्यांना समान वागणूक देतात. आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे. मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात परंतु आपल्या राज्यातून बाहेर प्रकल्प जाऊ नये ही आपली जबाबदारी आहे. ती आपण पाळू अशी ग्वाही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात दिली. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?पंतप्रधान हे देशाचे आहे. देशाच्या बाबतीत त्यांना सर्व राज्य एकसमान असली पाहिजेत. उद्या महाराष्ट्रातील हा प्रकल्प आसामला गेला असता तर मला वाईट नसते वाटले. गुजरात देशातच आहे. परंतु जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यात संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांनी विशाल विचार करायला हवा असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवालमहाराष्ट्रातील प्रकल्प आणि बाहेर जाणारे प्रकल्प याबाबत चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. आतापर्यंतचे जे प्रकल्प राज्याबाहेर केले आहेत, त्या सर्वांना महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप म्हणजेच रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. गुंतवणुकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र करणारच असा ठाम निश्चय व्यक्त करताना, ३ लाख कोटींवर गुंतवणूक तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार, तर ५ लाख लोकांना इतर रोजगार मिळणारा रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी