शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:49 IST

आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या कारणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केलेली असताना राज ठाकरे यांनीही अप्रत्यक्षपणे गुजरातला प्रकल्प जाण्यावरून नाराजी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातो याचे वाईट वाटते. पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य समान असली पाहिजे असं राज यांनी म्हटलं होते. 

राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं की, पंतप्रधान सगळ्या राज्यांना समान वागणूक देतात. आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे. मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात परंतु आपल्या राज्यातून बाहेर प्रकल्प जाऊ नये ही आपली जबाबदारी आहे. ती आपण पाळू अशी ग्वाही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात दिली. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?पंतप्रधान हे देशाचे आहे. देशाच्या बाबतीत त्यांना सर्व राज्य एकसमान असली पाहिजेत. उद्या महाराष्ट्रातील हा प्रकल्प आसामला गेला असता तर मला वाईट नसते वाटले. गुजरात देशातच आहे. परंतु जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यात संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांनी विशाल विचार करायला हवा असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवालमहाराष्ट्रातील प्रकल्प आणि बाहेर जाणारे प्रकल्प याबाबत चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. आतापर्यंतचे जे प्रकल्प राज्याबाहेर केले आहेत, त्या सर्वांना महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप म्हणजेच रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. गुंतवणुकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र करणारच असा ठाम निश्चय व्यक्त करताना, ३ लाख कोटींवर गुंतवणूक तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार, तर ५ लाख लोकांना इतर रोजगार मिळणारा रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी