शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: July 15, 2014 00:13 IST

पोटच्या गोळय़ांनी नाकारले, शासनाने झुगारले

आगर: श्रावण बाळ योजनेच्या येथील लाभार्थींचे अनुदान बंद झाले, असून, पोटच्या गोळय़ांनीही त्यांच्या पोषणाची जबाबदारी झटकल्यामुळे लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे. अटलबिहारी बाजपेयी सरकारच्या कार्यकाळात निराधार वृद्धांसाठी श्रावण बाळ योजना सुरू करण्यात आली. पोटी, पाठी वारस नसलेल्या, तसेच पोषणाचा आधार नसलेल्या आणि पाल्य किंवा अपत्यांनी पोषणाची जबाबदारी झटकलेल्या वृद्धांचा श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींमध्ये समावेश होतो. या लाभार्थींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा ६00 रुपये आर्थिक मदत दिली जाते. अकोला तालुक्यातील आगरसह परिसरात श्रावण बाळ योजनेचे शेकडो लाभार्थी आहेत. या लाभार्थींना गत चार महिन्यांपासून श्रावण बाळ योजनेचे अनुदान मिळाले नाही. पोटच्या गोळय़ांनी नाकारल्यानंतर शासनानेही झुगारल्यामुळे आम्ही जगावे तरी कसे, असा प्रश्न या लाभार्थींकडून उपस्थित करण्यात येत आहे. काही लाभार्थींच्या पोषणाची जबाबदारी त्यांचे वारस किंवा पाल्य सांभाळत असल्याचे पाहणीत आढळल्यामुळे अशा लाभार्थींचे अनुदान बंद करण्यात आल्याचे श्रावण बाळ योजनेशी संबंधित अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, तर आम्ही त्यांच्या पोषणाची जबाबदारी सांभाळण्यास असर्मथ असल्याचे पाल्य आणि वारसांनी लिहून दिल्याचे लाभार्थींकडून सांगण्यात येत आहे. या लाभार्थींंची समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी त्यांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करून द्यावे, अशी अपेक्षा या वृद्ध लाभार्थींकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)