शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

१६ लाख जनावरांची भूक निसर्गावर

By admin | Updated: July 7, 2014 22:28 IST

पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट

मेहकर : पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट घोंघावत असून, त्यामुळे पशूपालक अडचणीत आले आहेत. पश्‍चिम वर्‍हाडात जवळपास १६ लाख गुरं-ढोरं असून, जेमतेम जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने, त्यानंतर या मुक्या जिवांचे पोट निसर्गावर अंबलंबून राहणार आहे. पावसाअभावी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिलंवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाच्या झळा आता मुक्या जनावरांनाही सोसाव्या लागत आहेत. राना-वनात जनावरांसाठी चारा फारसा राहिलेला नाही. त्यामुळे चार्‍यासाठी जनावरांची, तर पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची भटकंती सुरू आहे. पश्‍चिम वर्‍हाडात एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरे आहेत. त्यापैकी अकोला जिलत २ लाख ७७ हजार ८८१ आणि वाशिम जिलत ३ लाख ४ हजार ३४७ जनावरे आहेत. बुलडाणा जिलत मेंढय़ा १ लाख २९ हजार ८३९, शेळ्या २ लाख ६७ हजार ४५१ व इतर जनावरे ६ लाख १६ हजार ३९८ आहेत. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात एकूण १0 लाख १३ हजार ६८८ एवढे पशुधन आहे. वाशिम जिलत २ लाख ४१ हजार ८६२ मोठी जनावरे असून, ६२ हजार ७८१ लहान जनावरे आहेत. मोठय़ा जनावरांना दिवसाकाठी सुमारे ७ किलो कोरडा चारा लागतो. छोट्या जनावरांना जवळपास ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो. पश्‍चिम वर्‍हाडात जेमतेम जुलै अखेरपर्यंत पुरेल, एवढाच चारा उपलब्ध आहे. साठवून ठेवलेला चारा संपल्याने पशुपालक मिळेल त्या भावात चारा खरेदी करीत आहेत. मार्च महिन्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, चार्‍याची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली होती. त्यामुळे चार्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जुलै अखेरपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास, पश्‍चिम वर्‍हाडात चारा विकत मिळणेही अवघड होणार आहे. या चारा टंचाईमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी अशी वेळ येण्या आधी प्रशासनाने पुर्व तयारी करण्याची गरज आहे. **दुधाळ जनावरंही धोक्यातअनेक शेतकर्‍यांजवळ दूध देणार्‍या गायी, म्हशी असल्याने या जनावरांना हिरवा चारा आवश्यक असतो; परंतू पाणीच नसल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दुधाळ जनावरांना हिरवा चारा न मिळाल्यास दुधाचाही तुटवडा निर्माण होईल.