शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दीडशे सिंचन योजना अडल्या

By admin | Updated: December 21, 2014 00:20 IST

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटत असतानाच विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अहवालात यालाच दुजोरा देणारे सत्य मांडण्यात आले आहे.

१५७ टीएमसी पाण्याचा वापर नाही : वैधानिक विकास मंडळाचा अहवालनागपूर: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटत असतानाच विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अहवालात यालाच दुजोरा देणारे सत्य मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार या भागातील १५० सिंचन योजना विविध कारणांमुळे अडल्या असून विदर्भाच्या वाट्याला येणारे १५७ टीएमसी (ट्रिलियन मीटर क्युसेक) पाणीही वापरले जात नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.ही आहेत कारणेसिंचन प्रकल्प दुर्लक्षित राहण्यामागे अधिकाऱ्यांची रिक्त पदे हे प्रमुख कारण अहवालात नमूद करण्यात आले आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळात शाखा अभियंता आणि उपअभियंता यांची ५७९ पदे (३० टक्के) रिक्त आहेत. वन कायद्याचाही फटका या योजनांना बसला आहे.अनुशेष वाढतोयविदर्भाचा अनुशेष सातत्याने वाढत आहे. दांडेकर समितीच्या अहवालानुसार १९८२ मध्ये विदर्भाचा सिंचन अनुशेष ५,२७,३१० हेक्टर होता. अनुशेष व निर्देशांक समितीच्या अहवालानुसार १९९४ मध्ये तो ७,९४,७०० हेक्टर गेला आणि २०११ मध्ये तो ११,६१,६९० हेक्टरवर गेला. एकट्या अमरावती विभागात २,२७,२६९ हेक्टरचा सिंचन अनुशेष आहे. ४,२६,८९३ कृषी पंपांचा अनुशेषविदर्भात ४,२६,८९३ कृषी पंपाचा अनुशेष आहे. या पंपांना वीज पुरवठा झाला असता तर सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली असती. राज्याच्या एकूण वीज निर्मितीपैकी ६१.३७ टक्के विदर्भात होत असली तरी प्रती हेक्टर वीज वापर कमी आहे. नागपूर विभागात प्रती हेक्टर वीज वापर ४१९ युनिट तर अमरावती विभागात ७०१ युनिट आहे. त्या तुलनेत अन्य भागात तो १ हजार युनिट आहे. २३९.७० कोटींची वसुली १२१.०३ कोटींचा खर्चजल कराच्या माध्यमातून जमा महसुलातून सिंचन योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु असे झाले नाही. विदर्भातून २०१०-११ आणि २०१२-१३ या दरम्यान एकूण २३९.७९ कोटी रुपये जल कर वसूल झाला.पण देखभाल दुरुस्तीवर १२१.०३ कोटी रुपये खर्च झाले.केळकर समितीचा अहवाल मंगळवारीराज्य सरकार मंगळवारी डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची शक्यता आहे. निधीचे समन्याय वाटप आणि अनुशेष यासंदर्भात या अहवालात शिफारशी करण्यात आल्या आहेत. या अहवालावर चर्चा करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. गत आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाचे सादरीकरण केले होते. पण अहवाल सार्वजनिक केला नव्हता. (प्रतिनिधी)