शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा विक्रमी निकाल

By admin | Updated: May 28, 2015 01:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील बारावीचे सर्व निकाल मोडीत निघाले असून यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे.

९१.२६ टक्के : मुलींची सरशी कायम, कोकण विभाग अव्वलमुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील बारावीचे सर्व निकाल मोडीत निघाले असून यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे. राज्यातील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९१.२६ टक्के इतकी असून निकालात यंदाही मुलीच आघाडीवर आहेत. मागील वर्षी ९०.०३ टक्के इतका निकाल लागला होता. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून नाशिक विभाग शेवटच्या स्थानावर आहे.पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४९ टक्के इतका अधिक आहे. मुलींंचा निकाल ९४.२९ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८८.८० टक्के लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) बदलेला अभ्यासक्रम आणि ८०/२० पॅर्टन यामुळे यंदाही निकालात वाढ झाली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व एचएससी व्होकेशनल या शाखांतील संपूर्ण राज्यातून १२ लाख ३८ हजार ९५४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १२ लाख ३७ हजार २४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ११ लाख २९ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के लागला असून रात्र शाळांचा निकाल ६५.०२ टक्के लागला आहे.मुलींचीच बाजीमुंबई मंडळातून १ लाख ३५ हजार मुली आणि १ लाख ५0 हजार ६९३ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३७६ मुले आणि १ लाख २६ हजार ४७0 मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ८७.१८ टक्के मुले तर ९३.३८ टक्के मुली परीक्षेला बसल्या असून या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.वाणिज्य शाखेतील सर्वाधिक विद्यार्थीदेशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल या शाखेतील सुमारे ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातून ५३ हजार ७२३ विद्यार्थी वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसले होते. तर इतर विभागांमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ ते २३ हजारांच्या दरम्यान आहे. मुंबईतून १ लाख ५९ हजार २३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४३ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९०.३१ टक्के लागला आहे.२३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखलेमुंबई मंडळात कॉपीची २३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कॉपीचे प्रमाण ०.०१ टक्के असले तरी मंडळाने विभागातील २३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहेत.