शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

बारावीचा विक्रमी निकाल

By admin | Updated: May 28, 2015 01:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील बारावीचे सर्व निकाल मोडीत निघाले असून यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे.

९१.२६ टक्के : मुलींची सरशी कायम, कोकण विभाग अव्वलमुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील बारावीचे सर्व निकाल मोडीत निघाले असून यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे. राज्यातील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९१.२६ टक्के इतकी असून निकालात यंदाही मुलीच आघाडीवर आहेत. मागील वर्षी ९०.०३ टक्के इतका निकाल लागला होता. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून नाशिक विभाग शेवटच्या स्थानावर आहे.पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४९ टक्के इतका अधिक आहे. मुलींंचा निकाल ९४.२९ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८८.८० टक्के लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) बदलेला अभ्यासक्रम आणि ८०/२० पॅर्टन यामुळे यंदाही निकालात वाढ झाली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व एचएससी व्होकेशनल या शाखांतील संपूर्ण राज्यातून १२ लाख ३८ हजार ९५४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १२ लाख ३७ हजार २४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ११ लाख २९ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के लागला असून रात्र शाळांचा निकाल ६५.०२ टक्के लागला आहे.मुलींचीच बाजीमुंबई मंडळातून १ लाख ३५ हजार मुली आणि १ लाख ५0 हजार ६९३ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३७६ मुले आणि १ लाख २६ हजार ४७0 मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ८७.१८ टक्के मुले तर ९३.३८ टक्के मुली परीक्षेला बसल्या असून या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.वाणिज्य शाखेतील सर्वाधिक विद्यार्थीदेशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल या शाखेतील सुमारे ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातून ५३ हजार ७२३ विद्यार्थी वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसले होते. तर इतर विभागांमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ ते २३ हजारांच्या दरम्यान आहे. मुंबईतून १ लाख ५९ हजार २३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४३ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९०.३१ टक्के लागला आहे.२३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखलेमुंबई मंडळात कॉपीची २३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कॉपीचे प्रमाण ०.०१ टक्के असले तरी मंडळाने विभागातील २३० विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहेत.