शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

By admin | Updated: June 2, 2014 22:32 IST

बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे.

पुणे : बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. विभागाचा निकाल ९०.७३ टक्के लागला असून अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. राज्याप्रमाणेच पुणे विभागातही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी पुणे विभागाचा निकालही राज्याप्रमाणे सर्वाधिक लागला आहे.पुणे विभागातून बारावी परीक्षेसाठी एकुण २ लाख २ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २ हजार ५१० जणांनी परीक्षा दिली. तर १ लाख ८३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तार्णतेची टक्केवारी ९०.७३ एवढी आहे. राज्यातील निकालामध्ये अनुक्रमे कोकण, अमरावती, कोल्हापूर व औरंगाबाद या विभागापाठोपाठ पुणे विभागाचा क्रमांक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विभागाचा निकाल ३१.१९ टक्के इतका लागला आहे. विभागात १ लाख १४ हजार ६०५ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ४५० मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६५ टक्के एवढे आहे. मुलींमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ९०५ मुलींपैकी ८३ हजार २८१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्हा ९०.४९ आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.०२ टक्के इतका लागला आहे. मुलींंच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे. शाखानिहाय निकालामध्ये पुणे विभागात विज्ञान शाखेचा निकाल ९४.४८ टक्के, कला शाखेचा ८५.३१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.०२ तर एमसीव्हीसीचा ९१.३४ टक्के निकाल आहे. जिल्हानिहाय निकालाची टक्केवारीजिल्हाटक्केवारीपुणे

मुले८७.२८मुली९४.२८एकुण९०.४९अहमदनगर

मुले८९.९४मुली९६.३५एकुण९२.५८सोलापूर

मुले८५.६८मुली९३.९८एकुण८९.०२पुणे विभागाची मागील सात वर्षाच्या निकालाची टक्केवारीवर्षटक्केवारी२०१४९०.७३२०१३७५.७७२०१२७५.७४२०११७३.५९२०१०७७.२०२००९८१.८५२००८८९.७२२००७७१.०९