पुणे : बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. विभागाचा निकाल ९०.७३ टक्के लागला असून अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. राज्याप्रमाणेच पुणे विभागातही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी पुणे विभागाचा निकालही राज्याप्रमाणे सर्वाधिक लागला आहे.पुणे विभागातून बारावी परीक्षेसाठी एकुण २ लाख २ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २ हजार ५१० जणांनी परीक्षा दिली. तर १ लाख ८३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तार्णतेची टक्केवारी ९०.७३ एवढी आहे. राज्यातील निकालामध्ये अनुक्रमे कोकण, अमरावती, कोल्हापूर व औरंगाबाद या विभागापाठोपाठ पुणे विभागाचा क्रमांक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विभागाचा निकाल ३१.१९ टक्के इतका लागला आहे. विभागात १ लाख १४ हजार ६०५ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ४५० मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६५ टक्के एवढे आहे. मुलींमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ९०५ मुलींपैकी ८३ हजार २८१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्हा ९०.४९ आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.०२ टक्के इतका लागला आहे. मुलींंच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे. शाखानिहाय निकालामध्ये पुणे विभागात विज्ञान शाखेचा निकाल ९४.४८ टक्के, कला शाखेचा ८५.३१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.०२ तर एमसीव्हीसीचा ९१.३४ टक्के निकाल आहे. जिल्हानिहाय निकालाची टक्केवारीजिल्हाटक्केवारीपुणे
मुले८७.२८मुली९४.२८एकुण९०.४९अहमदनगर
मुले८९.९४मुली९६.३५एकुण९२.५८सोलापूर
मुले८५.६८मुली९३.९८एकुण८९.०२पुणे विभागाची मागील सात वर्षाच्या निकालाची टक्केवारीवर्षटक्केवारी२०१४९०.७३२०१३७५.७७२०१२७५.७४२०११७३.५९२०१०७७.२०२००९८१.८५२००८८९.७२२००७७१.०९