शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:14 IST

९१.२५% लागला राज्याचा निकाल; गतवर्षीच्या तुलनेत घट कोकण विभाग अव्वल, विज्ञान शाखा सरस

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून १० पैकी एका विद्यार्थ्याने डिस्टिंक्शन मिळवल्याचे निकालातून दिसून आले आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का २.९७ टक्के घसरला आहे. 

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे याहीवर्षी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निकालामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे. मुंबईने निकालात तळ गाठला आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के, तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.     

ओव्हर रायटिंग वगळून विद्यार्थ्यांना मिळणार गुणऔरंगाबाद विभागीय मंडळात भाैतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हर रायटिंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ओव्हर रायटिंगचा मजकूर वगळता सर्वांना गुण दिले आहेत, तसेच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासह इंग्रजी विषयात चुकीचा प्रश्न नाेंदवून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना गुण दिले असल्याचेही ते म्हणाले.

विभागनिहाय निकाल     विद्यार्थी    उत्तीर्ण     टक्केवारीकोकण    २६,१२३    २४,९९०    ९६.०१ पुणे    २,४२,७३४    २,२४,६६५    ९३.३४ कोल्हापूर    १,१८,७९१    १,१०,११०    ९३.२८ अमरावती    १,३९,७६९    १,२८,५२१    ९२.७५ औरंगाबाद    १,६६,५५१    १,५१,१४८    ९१.८५ नाशिक    १,५९,९८७    १,४५,७४९    ९१.६६ लातूर    ८९,७८२    ७९,५७२    ९०.३७नागपूर    १,५३,२९६    १,३७,४५५    ९०.३५ मुंबई    ३,३१,१६१    २,९०,२५८    ८८.१३ 

मुलींचाच डंका 

n राज्यात ७ लाख ६७ हजार ३८६ मुलांनी बारावीची परीक्षा दिली. n त्यापैकी ६ लाख ८४ हजार ११८ उत्तीर्ण झाले, तर ६ लाख ४८ हजार ९८५ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

पुनर्परीक्षेत काय झाले?राज्यात ३५,५८३ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली हाेती. त्यातील १५,७७५ उत्तीर्ण झाले. 

साडेपाच हजार दिव्यांगांचे यश९ विभागांतील विविध शाखांमधून ६ हजार ७२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ५,६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल