शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:14 IST

९१.२५% लागला राज्याचा निकाल; गतवर्षीच्या तुलनेत घट कोकण विभाग अव्वल, विज्ञान शाखा सरस

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून १० पैकी एका विद्यार्थ्याने डिस्टिंक्शन मिळवल्याचे निकालातून दिसून आले आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का २.९७ टक्के घसरला आहे. 

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे याहीवर्षी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निकालामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे. मुंबईने निकालात तळ गाठला आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के, तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.     

ओव्हर रायटिंग वगळून विद्यार्थ्यांना मिळणार गुणऔरंगाबाद विभागीय मंडळात भाैतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हर रायटिंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ओव्हर रायटिंगचा मजकूर वगळता सर्वांना गुण दिले आहेत, तसेच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासह इंग्रजी विषयात चुकीचा प्रश्न नाेंदवून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना गुण दिले असल्याचेही ते म्हणाले.

विभागनिहाय निकाल     विद्यार्थी    उत्तीर्ण     टक्केवारीकोकण    २६,१२३    २४,९९०    ९६.०१ पुणे    २,४२,७३४    २,२४,६६५    ९३.३४ कोल्हापूर    १,१८,७९१    १,१०,११०    ९३.२८ अमरावती    १,३९,७६९    १,२८,५२१    ९२.७५ औरंगाबाद    १,६६,५५१    १,५१,१४८    ९१.८५ नाशिक    १,५९,९८७    १,४५,७४९    ९१.६६ लातूर    ८९,७८२    ७९,५७२    ९०.३७नागपूर    १,५३,२९६    १,३७,४५५    ९०.३५ मुंबई    ३,३१,१६१    २,९०,२५८    ८८.१३ 

मुलींचाच डंका 

n राज्यात ७ लाख ६७ हजार ३८६ मुलांनी बारावीची परीक्षा दिली. n त्यापैकी ६ लाख ८४ हजार ११८ उत्तीर्ण झाले, तर ६ लाख ४८ हजार ९८५ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

पुनर्परीक्षेत काय झाले?राज्यात ३५,५८३ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली हाेती. त्यातील १५,७७५ उत्तीर्ण झाले. 

साडेपाच हजार दिव्यांगांचे यश९ विभागांतील विविध शाखांमधून ६ हजार ७२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ५,६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल