शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

बारावीचा पहिला पेपर सुरळीत

By admin | Updated: March 1, 2017 02:41 IST

विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली.

नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला असून, मुंबई विभागातील ५५७ केंद्रावर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे, तर ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रावर ९६ हजार १८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून, यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण अधिकारी यांचे पाचवे पथक, तर सहावे महिलांच्या आणि सातवे बोर्डाच्या पथकाचा यात समावेश आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. परीक्षेच्या अर्धा तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या ठिकाणी उपस्थित होते. यावर्षी विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ज्या केंद्रांवर आसन व्यवस्थेत अडचणी आल्या, अशा केंद्रानी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये बैठक व्यवस्था केली होती. बुधवारी ११ ते २ या वेळेत हिंदीचा पेपर होणार असून १ लाख २४ हजार ६६ विद्यार्थी हिंदीचा पेपर देणार आहेत. विद्यार्थी तसेच पर्यवेक्षक मोबाइल वापरास बंदी करण्यात आल्याने ज्यांच्याकडे मोबाइल फोन आढळले, अशा विद्यार्थ्यांचे फोन जमा करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालकांशिवाय इतरांना मोबाइल फोनचा वापर करण्यास बंदी करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर दिव्यांगाकरिता विशेष सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विशेष कस्टडीत जमा केल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेरील गेटवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार न घडल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेळेचे पालन चोखपणे करण्यात आल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)