शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातून १५ लाख विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:14 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहावे, असेआवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.प्रश्नपत्रिका ज्या वेळी मंडळाकडून केंद्रप्रमुखांकडे हस्तांतरित केल्या जातात, त्या दरम्यानच्या १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत काही ठिकाणी पेपर फुटल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मंडळाने यंदा प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे तयार करून ती विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनेच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा देण्यास उशिरा आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे. राज्यातील केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवावेत, असा प्रस्ताव मागील वर्षी विचाराधीन होता. त्याबाबत यंदा निर्णय झालेला नाही.राज्य मंडळाकडून यंदा काही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची विद्यार्थ्यांना मुभा दिली होती. मात्र केवळ १५८ विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षणाचे विषय परीक्षेसाठी निवडले आहेत.१४ लाखांवर परीक्षार्थीबारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.‘कॉपी’साठी २५२ पथकेकॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षा