शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

खड्ड्यांमुळे किती बळी जायची वाट पाहताय ? हायकोर्टाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:35 IST

खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे

ठळक मुद्दे खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहेखड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

मुंबई, दि. 3- राज्यातील जनतेला चांगले रस्ते देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण हेच कर्तव्य तुम्ही पूर्ण करत नाही, ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नांवर तुम्ही तयार केलेल्या समित्यांवर आता आमची 'सुपर कमिटी' नेमावी, असं आम्हाला वाटायला लागलं आहे, असं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लुर यांनी म्हंटलं आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. खड्डे बुजविण्यासाठी केलेलं डांबरीकरणही पावसामुळे वाहून जातं आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पाहायला मिळतात. या मुद्द्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने २०१३ मध्ये स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. तेव्हा सरकारच्या निष्काळजीपणावर आणि निष्क्रियतेला कोर्टाकडून चांगलंच सुनविण्यात आलं होतं. याच याचिकेच्या आधारे, काही वकिलांनी खड्ड्यांच्या प्रश्नाकडे न्यायमूर्तींचं लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसांत खड्डयांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याचं या वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा, मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सरकारला चांगलंच फटकारलं.  खड्ड्यांचा प्रश्न फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यात आहे. आपण नागरिकांना चांगले रस्तेही देऊ शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचा जीव जावा, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. स्थानिक प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसेल तर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी पोहोचवाव्यात, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली आहे.