शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

खड्ड्यांमुळे किती बळी जायची वाट पाहताय ? हायकोर्टाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:35 IST

खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे

ठळक मुद्दे खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहेखड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

मुंबई, दि. 3- राज्यातील जनतेला चांगले रस्ते देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण हेच कर्तव्य तुम्ही पूर्ण करत नाही, ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात, असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिका प्रशासनाला विचारला आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करताना कोर्टाने सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. 

रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नांवर तुम्ही तयार केलेल्या समित्यांवर आता आमची 'सुपर कमिटी' नेमावी, असं आम्हाला वाटायला लागलं आहे, असं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लुर यांनी म्हंटलं आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. खड्डे बुजविण्यासाठी केलेलं डांबरीकरणही पावसामुळे वाहून जातं आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पाहायला मिळतात. या मुद्द्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने २०१३ मध्ये स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. तेव्हा सरकारच्या निष्काळजीपणावर आणि निष्क्रियतेला कोर्टाकडून चांगलंच सुनविण्यात आलं होतं. याच याचिकेच्या आधारे, काही वकिलांनी खड्ड्यांच्या प्रश्नाकडे न्यायमूर्तींचं लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसांत खड्डयांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याचं या वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा, मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सरकारला चांगलंच फटकारलं.  खड्ड्यांचा प्रश्न फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यात आहे. आपण नागरिकांना चांगले रस्तेही देऊ शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचा जीव जावा, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. स्थानिक प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसेल तर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी पोहोचवाव्यात, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली आहे.