शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट तपासाचे दोन वेगळे निष्कर्ष कसे? उच्च न्यायालयाची एनआयएला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:26 IST

मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयहून वेगळा निष्कर्ष काढत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) नऊ आरोपींना क्लीन चिट देऊन अन्य चौघांना कसे आरोपी केले, असा प्रश्न उच्च न्यायालयाने एनआयएला गुरुवारी केला.

मुंबई : मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयहून वेगळा निष्कर्ष काढत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) नऊ आरोपींना क्लीन चिट देऊन अन्य चौघांना कसे आरोपी केले, असा प्रश्न उच्च न्यायालयाने एनआयएला गुरुवारी केला.एटीएस व सीबीआयने मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी नऊ मुस्लीम तरुणांना आरोपी केले. मात्र, २०११मध्ये एनआयएने प्रकरणाचा नव्याने तपास करीत त्यांना क्लीन चिट देत उजव्या जहालवादी संघटनेच्या चौघांना अटक केली. एनआयएने क्लीन चिट दिल्याने विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी २५ एप्रिलला नऊ मुस्लीम आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर एनआयएने अटक केलेले मनोहर नरवारीया, राजेंद्र चौधरी, धनसिंग, लोकेश शर्मा जामिनासाठी उच्च न्यायालयात गेले. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील, न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठापुढे होती. ‘सीबीआय व एटीएससारख्या तपासयंत्रणांपेक्षा एनआयए वेगळा निष्कर्ष कसा काढू शकते? ज्यांचे नाव यादीत नव्हते, त्यांना आरोपी कसे केले,’ अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने एनआयएवर केली.यांची आरोपमुक्ततानरुल हुडा, रईस अहमद, सलमान फर्सी, फरोग मगदुमी, शेख मोहम्मद अली, असिफ खान, मोहम्मद झहीद, अब्रार अहमद आणि शब्बीर मसीउल्ला बॅटरीवाला यांना एटीएस व सीबीआयने आरोपी केले आहे. मात्र विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय