शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

‘नोक-यांमधील टायपिंगची अट कायम कशी?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 04:13 IST

टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोक-यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी, असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

यवतमाळ : टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोक-यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी, असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.६० टक्के अपंग असलेले प्रदीप बी. बाल्यापली मुंबईच्या राज्य कामगार विमा योजना कार्यालयात (ईएसआयसी) लॅब असिस्टंट पदावर कार्यरत होते. त्यांना एमएस-सीआयटी ही संगणकीय परीक्षा आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. अपंगत्वामुळे टायपिंग मशीनमध्ये हाताची बोटे अडत असल्याने त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही. त्यामुळे लिपिक-टायपिस्ट पदाच्या नोकरीवरून प्रदीप यांना काढून टाकले आणि शिपाई पदावर नियुक्ती देण्याची तयारी दर्शविली.याविरोधात प्रदीप यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. टायपिंगच्या मुद्यावर ‘मॅट’ने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.