शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

स्थगितीनंतरही मराठा आरक्षण कसे दिले?

By admin | Updated: January 6, 2015 02:58 IST

अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला केला.

हायकोर्टाचा सवाल : सरकारला उत्तरासाठी तीन आठवडेमुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकूमास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला केला.मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या वटहुकूमांना आव्हान देणाऱ्या जनहित याचिका पुढील सुनावणीसाठी आल्या तेव्हा मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने हा सवाल केला. अंतरिम स्थगितीविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात का धाव घेतली, असेही खंडपीठाने विचारले.आधीच्या सरकारच्या काळात अ‍ॅडव्होकेट जनरल असलेले दरायस खंबाटा हेच आताही सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्यासोबत सरकारतर्फे काम पाहात आहेत. याचिका पुकारल्या जाताच खंबाटा उभे राहिले व त्यांनी मराठा आरक्षण नव्याने लागू केले जाणार असून यात कायदेशीरबाबींचे कोठेही उल्लंघन केलेले नाही, असे स्पष्ट केले. तसेच मुस्लिम आरक्षण दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावर न्यायालयाने नव्याने केलेल्या कायद्याचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र सरकारने तीन आठवड्यांत सादर करावे व त्याचे प्रत्युत्तर याचिकाकर्त्यांनी त्यानंतर दोन आठवड्यांत द्यावे, असे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी पाच आठवड्यांसाठी तहकूब केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने जारी केलेल्या या आरक्षणाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. याविरोधात नवर्विचित भाजप सरकाराने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास नकार दिला. अखेर सोमवारी याची सुनावणी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावर याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र शासनाने सादर करावे व शासनाच्या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर सादर करायचे असल्यास ते त्या पुढील दोन आठवड्यात याचिकाकर्त्यांनी सादर करावे, असे आदेश खंडपीठाने दिले. या आरक्षणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर व इतरांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. हे आरक्षण घटनाबाह्ण असून ते रद्द करावे, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)धनगर आरक्षणाला मंत्र्याचा विरोधच्धनगरांना आरक्षण देण्यास आपला विरोध असून कुठल्याही परिस्थितीत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणारा निर्णय सरकारला घेऊ देणार नाही, असा इशारा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिला. धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाच्या सर्वपक्षीय चार खासदार व २४ आमदारांचा विरोध असल्याचे सवरा यांनी सांगितले.च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथील धनगर समाज संघर्ष समितीच्या आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात बोलताना धनगर आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांत घेऊ, अशी घोषणा केली होती. च्त्याबाबत सवरा यांना विचारले असता ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देणे ही राज्यघटनेच्या विपरीत अशी ती कृती असेल. आदिवासी समाजातील सर्वपक्षीय खासदार व आमदारांचा धनगर आरक्षणाला विरोध आहे.च्आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास ते सहन केले जाणार नाही. धनगरांना आरक्षण द्यायचेच असेल तर आदिवासींच्या आरक्षणाला हात न लावता द्यावे, असे सवरा यांनी सोमवारी स्पष्ट केले.