शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

राज्यातील राखीव वनजमिनींची खरेदी-विक्री कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:38 IST

राज्यात राखीव वने, संरक्षित क्षेत्रांना वैधानिक दर्जा प्राप्त असताना, वनजमिनींची खरेदी-विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमरावती : राज्यात राखीव वने, संरक्षित क्षेत्रांना वैधानिक दर्जा प्राप्त असताना, वनजमिनींची खरेदी-विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, वनाधिका-यांनी याबाबत फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचे काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रमांक २०२१/९५ व १७१/९६ टी.एम. गोदावरम विरुद्ध भारत सरकार प्रकरणात वनजमिनींची व्याख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, शासकीय अभिलेखात ‘वनजमीन’ असा उल्लेख असल्यास वनसंवर्धन अधिनियम १९८० चे नियम लागू होतात. त्यामुळे व्यक्ती, संस्था, सोसायट्यांना विशिष्ट प्रयोजनासाठी दिली गेलेली राखीव वने, संरक्षित क्षेत्रातील जमीन दुसºया प्रयोजनासाठी वापरता येत नाही. त्या जमिनी भोगवटदार-२ म्हणून संबोधल्या जातात तसेच या जमिनींचे भोगवटदार-१ करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते.

असे असताना राज्यात ३६ जिल्हाधिकारी, १७५ उपविभागीय अधिकारी व ३५६ तहसीलदारांनी  केंद्र सरकारची परवानगी न घेता हजारो प्रकरणे भोगवटदार २ मधून वर्ग १ केली आहेत. वनजमिनींबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पावले उचलली असताना, महसूल विभागाने या धोरणांची पायमल्ली चालविली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २३ नुसार राखीव वनजमीन ज्यांच्या ताब्यात आहे, ती त्यांच्या वारसदारांच्या नावावर करता येते. यात मुलगा, पत्नी, मुलगी, नात, नातू यांचा समावेश आहे. परंतु, हजारो प्रकरणांत वारसदार सोडून दुस-यांच्या नावे वनजमिनी करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान वनसचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्या संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

 दोन हेक्टर वनजमिनीवर स्टोन क्रेशरअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मौजे कºहे येथे भूमापन क्रमांक ४५३ मध्ये जमिनीचा उल्लेख ‘वनविभाग राखीव वन’ असा स्पष्ट असतानादेखील स्टोन के्रशर युनिटसाठी परवानगी मिळाली आहे. वनजमिनींचे भोगवटदार-२ मधून वर्ग १ असे करण्यात येत असल्याने राखीव वनक्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे.