शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राज्यातील राखीव वनजमिनींची खरेदी-विक्री कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:38 IST

राज्यात राखीव वने, संरक्षित क्षेत्रांना वैधानिक दर्जा प्राप्त असताना, वनजमिनींची खरेदी-विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमरावती : राज्यात राखीव वने, संरक्षित क्षेत्रांना वैधानिक दर्जा प्राप्त असताना, वनजमिनींची खरेदी-विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, वनाधिका-यांनी याबाबत फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचे काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रमांक २०२१/९५ व १७१/९६ टी.एम. गोदावरम विरुद्ध भारत सरकार प्रकरणात वनजमिनींची व्याख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, शासकीय अभिलेखात ‘वनजमीन’ असा उल्लेख असल्यास वनसंवर्धन अधिनियम १९८० चे नियम लागू होतात. त्यामुळे व्यक्ती, संस्था, सोसायट्यांना विशिष्ट प्रयोजनासाठी दिली गेलेली राखीव वने, संरक्षित क्षेत्रातील जमीन दुसºया प्रयोजनासाठी वापरता येत नाही. त्या जमिनी भोगवटदार-२ म्हणून संबोधल्या जातात तसेच या जमिनींचे भोगवटदार-१ करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते.

असे असताना राज्यात ३६ जिल्हाधिकारी, १७५ उपविभागीय अधिकारी व ३५६ तहसीलदारांनी  केंद्र सरकारची परवानगी न घेता हजारो प्रकरणे भोगवटदार २ मधून वर्ग १ केली आहेत. वनजमिनींबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पावले उचलली असताना, महसूल विभागाने या धोरणांची पायमल्ली चालविली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २३ नुसार राखीव वनजमीन ज्यांच्या ताब्यात आहे, ती त्यांच्या वारसदारांच्या नावावर करता येते. यात मुलगा, पत्नी, मुलगी, नात, नातू यांचा समावेश आहे. परंतु, हजारो प्रकरणांत वारसदार सोडून दुस-यांच्या नावे वनजमिनी करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान वनसचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्या संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

 दोन हेक्टर वनजमिनीवर स्टोन क्रेशरअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मौजे कºहे येथे भूमापन क्रमांक ४५३ मध्ये जमिनीचा उल्लेख ‘वनविभाग राखीव वन’ असा स्पष्ट असतानादेखील स्टोन के्रशर युनिटसाठी परवानगी मिळाली आहे. वनजमिनींचे भोगवटदार-२ मधून वर्ग १ असे करण्यात येत असल्याने राखीव वनक्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे.