शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

गृहिणींचं कोलमडलं बजेट, भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 13:13 IST

सध्या बाजारात भाजीपाल्याचे दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 25 - सध्या बाजारात भाजीपाल्याचे दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे भाजी बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष करून टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून टोमॅटो सध्या 120 रुपये किलो या दराने विकला जात आहे. यामुळे गृहिणींचं बजेट कोलडमले आहे. 
 
दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाला महागतो. परंतु यंदा  भाजीपाल्याच्या दरात अंदाजापेक्षा खूपच अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत सध्या सर्वच भाज्या महागल्या असून इतर जिल्ह्यातून भाजीपाला येत असल्याने वाहतूक खर्च, अडत तसेच घाऊक व्यापा-यांकडून किरकोळ भाजीविक्रेत्यापर्यंत भाजीपाला येईपर्यंत त्यांच्या किमतीत अधिकच वाढ होते.
त्यामुळे किरकोळ विक्रेतेसुद्धा अपेक्षित मजुरी मिळावी, म्हणून ग्राहकांना वाढत्या दरानेच भाजीविक्री करत आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. गेल्या महिन्यात व आता मिळणा-या भाजीच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. 
 
फुलकोबी १०० रुपये प्रति किलो, कोबी ४० ते ६० रुपये प्रति किलो, भेंडी १२० रुपये प्रति किलो, चवळीच्या शेंगा शंभर रुपये प्रति किलो, हिरवी मिरची ८० रुपये प्रति किलो, पालक ४० रुपये प्रति किलो, काकडी १०० रुपये प्रति किलो, कारले ६० रुपये प्रति किलो, दुधी भोपळा ४० ते ६० रुपये प्रति किलो असे सध्याचे भाजीपाल्याचे दर आहेत. सर्वाधिक चर्चा सध्या टोमॅटोची आहे. बाजारात सध्या सर्वात प्रति किलो १२० रुपये दराने टोमॅटो विकला जात आहे. 
 
त्यामुळे जेवणात टोमॅटो दिसेनासा झाला आहेच शिवाय भेळ गाडी, खानावळी या ठिकाणाहून टोमॅटो हद्दपार झाल्याच दिसत आहे. विदर्भात सध्या टोमॅटो नसल्याने बाजारात येणारे टोमॅटो हे अहमदनगर येथून येत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.