शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

घरात, शेतात पुरल्या बारावीच्या उत्तरपत्रिका!

By admin | Updated: March 24, 2016 02:02 IST

बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने

जालना : बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने बुधवारी राजेंद्र पाटील आणि शिंदे (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी घरात व शेतात उत्तरपत्रिका पुरल्या होत्या.त्यांच्याकडून १५० पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. सुरुवातीला आडेवेढे घेणाऱ्या दोघांना खाक्या दाखविताच घरात आणि शेतात पुरुन ठेवलेल्या पुनर्लेखन झालेल्या तब्बल दीडशे उत्तरपत्रिका त्यांनी पोलिसांना दिल्या. या उत्तरपत्रिका श्रीमंत वाघ यानेच दोघांना दिल्याचे तपासात आढळून आले आहे. जालन्यातील अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर छापा टाकून पुनर्लेखन केलेल्या २,५०० आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी अटक केलेल्या श्रीमंत वाघ, अंकुश पालवे आणि सुदीप राठोडच्या चौकशीतून पोलिसांना दररोज धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या राजूर येथील महाविद्यालयातील प्रा. एस. एम. दाभाडे याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांवर दबाव?गुणवाढ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. सध्या हे पथक रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी संपूर्ण मराठवाडा पालथा घालत आहे. मात्र, काही ठिकाणी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच पथकाला परत बोलावले जात आहे. त्यासाठी पथकावर आणि पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)