शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

घरात, शेतात पुरल्या बारावीच्या उत्तरपत्रिका!

By admin | Updated: March 24, 2016 02:02 IST

बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने

जालना : बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने बुधवारी राजेंद्र पाटील आणि शिंदे (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी घरात व शेतात उत्तरपत्रिका पुरल्या होत्या.त्यांच्याकडून १५० पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. सुरुवातीला आडेवेढे घेणाऱ्या दोघांना खाक्या दाखविताच घरात आणि शेतात पुरुन ठेवलेल्या पुनर्लेखन झालेल्या तब्बल दीडशे उत्तरपत्रिका त्यांनी पोलिसांना दिल्या. या उत्तरपत्रिका श्रीमंत वाघ यानेच दोघांना दिल्याचे तपासात आढळून आले आहे. जालन्यातील अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर छापा टाकून पुनर्लेखन केलेल्या २,५०० आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी अटक केलेल्या श्रीमंत वाघ, अंकुश पालवे आणि सुदीप राठोडच्या चौकशीतून पोलिसांना दररोज धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या राजूर येथील महाविद्यालयातील प्रा. एस. एम. दाभाडे याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांवर दबाव?गुणवाढ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. सध्या हे पथक रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी संपूर्ण मराठवाडा पालथा घालत आहे. मात्र, काही ठिकाणी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच पथकाला परत बोलावले जात आहे. त्यासाठी पथकावर आणि पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)