शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

घरात, शेतात पुरल्या बारावीच्या उत्तरपत्रिका!

By admin | Updated: March 24, 2016 02:02 IST

बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने

जालना : बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये पुनर्लेखनाद्वारे गुणवाढ करण्याच्या रॅकेटमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात अंबड तालुक्यातील रोहिलागड येथून पोलीस पथकाने बुधवारी राजेंद्र पाटील आणि शिंदे (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी घरात व शेतात उत्तरपत्रिका पुरल्या होत्या.त्यांच्याकडून १५० पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. सुरुवातीला आडेवेढे घेणाऱ्या दोघांना खाक्या दाखविताच घरात आणि शेतात पुरुन ठेवलेल्या पुनर्लेखन झालेल्या तब्बल दीडशे उत्तरपत्रिका त्यांनी पोलिसांना दिल्या. या उत्तरपत्रिका श्रीमंत वाघ यानेच दोघांना दिल्याचे तपासात आढळून आले आहे. जालन्यातील अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर छापा टाकून पुनर्लेखन केलेल्या २,५०० आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी अटक केलेल्या श्रीमंत वाघ, अंकुश पालवे आणि सुदीप राठोडच्या चौकशीतून पोलिसांना दररोज धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या राजूर येथील महाविद्यालयातील प्रा. एस. एम. दाभाडे याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांवर दबाव?गुणवाढ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. सध्या हे पथक रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी संपूर्ण मराठवाडा पालथा घालत आहे. मात्र, काही ठिकाणी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच पथकाला परत बोलावले जात आहे. त्यासाठी पथकावर आणि पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)