शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंबईकरांना हुडहुडी : राज्यातील तापमानातही घट ,मुंबई १९.३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:14 IST

राज्यातल्या प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच आता मुंबईचे किमान तापमानही खाली आले आहे.

मुंबई : राज्यातल्या प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच आता मुंबईचे किमान तापमानही खाली आले आहे. मुंबईचे किमान तापमान २४ ते २६ अंशाहून थेट २१ अंशावर घसरले आहे. सोमवारी तर मुंबईचे किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: रविवारच्या रात्री आणि सोमवारी पहाटे मुंबईत सुटलेल्या गार वाºयाने मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव दिला. किमान तापमानात आता उत्तरोत्तर आणखी घट होणार आहे. परिणामी, किमान तापमानात होणारी घट मुंबईकरांना हुडहुडी भरवणार आहे.आॅक्टोबर हिटचा तडाखा बसलेल्या मुंबईच्या कमाल तापमानाने थेट ३६ अंशावर मजल मारली होती. आर्द्रतेमध्येही वाढ झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. वातावरणात होत असलेले बदल आॅक्टोबर हिटमध्ये भरच घालत असल्याने मुंबई चांगलीच तापली होती. आता मात्र नोव्हेंबरच्या मध्यात तापमानाचा पारा घसरला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईचे किमान तापमान २८ अंशाच्या आसपास नोंदवत होते. कालांतराने यात काही अंशी घट झाली व किमान तापमान २६ अंशावर घसरले. दरम्यानच्या काळात राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच मुंबईच्या किमान तापमानातही उल्लेखनीय घट झाली; आणि मुंबईचे किमान तापमान थेट २४ वरून २१ अंशावर येऊन ठेपले. आता तर किमान तापमान १९.३ अंश नोंदवले आहे. रविवारी रात्री सुटलेल्या गार वाºयामुळे मुंबईकरांना थंडीचा प्रत्यय आला. सोमवारी सकाळीही हवेत गारवा पडल्याने मुंबईमधील वातावरण आल्हाददायक झाले होते.

टॅग्स :Mumbaiमुंबई