शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ऑरेकल"कडून सन्मान

By admin | Updated: May 9, 2017 14:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असामान्य दृष्टी आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना "टेक्नोलॉजी ट्रान्सफॉर्मेशन" हा पुरस्कार देऊन ऑरेकलनं त्यांचा गौरव केलाय.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने एक प्रभावी, स्वच्छ व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. ते राज्याला विकासाच्या योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेत घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी "ऑरेकल"नं त्यांचा सन्मान केला आहे.   
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असामान्य दृष्टी आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना "टेक्नोलॉजी ट्रान्सफॉर्मेशन" हा पुरस्कार देऊन "ऑरेकल"नं त्यांचा गौरव केला आहे. "ऑरेकल"चे सीईओ साफ्रा कार्ट्स यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  
 
"ऑरेकलकडून मिळालेला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सेवांमध्ये तंत्रज्ञानातील नवकल्पनांचा विचार करुन त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याच्या प्रयत्नांना मिळालेल्या मान्यता आहे", अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 
 
यावेळी, महाराष्ट्र राज्यात आयटी क्षेत्रामधील सेवा वितरणासंबंधींच्या सुधारणांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.  आपले सरकार, स्मार्ट सिटी, गाव जोडणी योजना, महाडीबीटी, महानेट, सीसीटीव्ही, आधार कायदा यांसारख्या अनेक योजना आणि धोरणांमध्ये तंत्रज्ञान परिवर्तन घडून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, आयआयएम यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत. 
 
राज्यातील 14, 000 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आल्या असून उर्वरित ग्रामपंचायती जोडण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक तहसील आणि शाळांचे डिजीटायझेशन करण्याचे काम करत आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत.  
 
2016मध्ये  नागपूरमधील 5 खेड्यांचे "डिझिटायझेशन"  
दरम्यान, 2016मध्ये नागपूर जिल्ह्यामधल्या पाच खेड्यांच्या ग्रामपंचायतींचे ‘डिझिटायझेशन’  करण्यात आले. त्याशिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना 2018 अखेरपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत झालेल्या 11व्या आंतरराज्य परिषदेमध्ये दिली. 
 
"ऑप्टिकल फायबर म्हणजे काय?"
ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत वेगाने माहिती एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठीची काचेची तार. म्हणजेच आधी ऑप्टिकल फायबर वापरून तारांचे जाळे निर्माण करायचे आणि या जाळ्याचा वापर बिनतारी इंटरनेटची वेगवान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करायचा असे यामागचे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच आपण सगळे वापरत असलेल्या इंटरनेटमध्ये ऑप्टिकल फायबरची भूमिका खूप मोठी आहे. शहरांमध्ये रस्त्यांखालून दूरसंचार कंपन्यांनी अशा ऑप्टिकल फायबर्सची जाळी विणलेली असते.