शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

रोह्यात घर पडले

By admin | Updated: June 28, 2016 02:30 IST

गेले दोन दिवस कोसळलेल्या दमदार पावसाने रोहे शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले.

रोहा : गेले दोन दिवस कोसळलेल्या दमदार पावसाने रोहे शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले होते. त्यातच रोहे तालुक्यातील चणेराजवळील खंदार आदिवासीवाडीतील एक घर जमीनदोस्त झाले. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. यातील महिला गंभीर जखमी असल्याने तिला अधिक उपचारासाठी अलिबाग जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महसूल खात्याची टीम तब्बल १५ तासांनंतर घटनास्थळी पोहचली. सरकारी आरोग्य यंत्रणेकडून जखमी व्यक्तींची अवहेलना आणि महसूल खात्याच्या सुस्तपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती. रोहे तालुक्यातील चणेराजवळील सारसोली ग्रामपंचायत हद्दीतील खंदार आदिवासीवाडी येथे आदिवासी बांधवांची ६० ते ७० घरे असून येथे दीडशेहून अधिक लोकसंख्या आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वा. कोसळणाऱ्या दमदार पावसात येथील संदीप सहादेव वाघमारे (३५) हे पत्नी मंगला संदीप वाघमारे (३०) व मुलगी संजना संदीप वाघमारे, मुलगा संजय संदीप वाघमारे हे घरात बसले होते, त्यावेळी अचानक घर कोसळले. संपूर्ण घर या चौघांवर कोसळल्याने ते जखमी झाले. वाडीवर घर कोसळण्याचे दृश्य बघताच शेजारील आदिवासी बांधवांनी धाव घेत तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या वाघमारे कुटुंबीयांना बाहेर काढले. विशेष म्हणजे घटना घडण्यापूर्वी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या दुर्दैवी घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मंगला संदीप वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्रथमोपचारासाठी कोकबन आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गंभीर जखमी असून देखील जखमी महिला उपचारापासून वंचित राहिली. पावसाच्या सुरुवातीलाच शासकीय आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले अशी प्रतिक्रि या अनेकांनी दिली. घर पडून गंभीर जखमी झालेल्या या विवाहित महिलेवर किंचितही उपचार न करता तिला घरी पाठविण्यात आले. तसेच रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याचे सांगण्यात आले.तब्बल १५ तास या महिलेला उपचाराकरिता ताटकळत थांबावे लागले. तद्नंतर जखमी वाघमारे कुटुंबीयांना उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने जखमी महिलेला मुंबईत हलविण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले असे समजते. घटनेनंतर तातडीने सरपंच संतोष भौड, हसमुख जैन, सदस्य रवींद्र वाघमारे, संतोष पोेळेकर, रवी वाघमारे, ग्रामसेवक दीपक वारंगे आदिंनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)>पंचनामा करण्याचे आदेशया घटनेची माहिती रोहा तहसील कार्यालयाला १४ तासांनंतर समजली, तर तब्बल १५ तासांनंतर तहसीलदार दीपक गायकवाड आपत्कालीन व्यवस्था पथकासमवेत घटनास्थळी पोहचले. अपघाताविषयी प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. त्यामुळे नुकसानग्रस्त व जखमी वाघमारे कुटुंबीयांपर्यंत सरकारी यंत्रणा उशिरा पोहचली अशी कबुली तहसीलदार गायकवाड यांनी दिली. नुकसानग्रस्त वाघमारे कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीतजास्त मदत मिळावी याकरिता आपण जातीने लक्ष घालणार अशी प्रतिक्रि या तहसीलदार गायकवाड यांनी व्यक्त केली तर घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश मंडल अधिकारी व तलाठी यांना दिला आहे, असे ते म्हणाले. तब्बल १५ तास या महिलेला उपचाराकरिता ताटकळत थांबावे लागले. जखमी वाघमारे कुटुंबीयांना उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने जखमी महिलेला मुंबईत हलविण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.>तळा येथे रस्ता झाला जलमयशहरातील मांदाड रस्त्यावरील रातवडकर वाडा ते देवीचा चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे बांधलेली नसल्यामुळे गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे.मे महिन्याच्या अखेरीस या मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव यांनी भरण्याचे काम केले. परंतु एकाच बाजूला असणारे गटार मात्र साफ केले नाही, ते कचऱ्याने तुडुंब भरलेले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे गटारातून पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर आले आणि रस्ता जलमय झाला. या रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून वाहन चालकांना वाहन घेवून जाणे मुश्कील झाले आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. >घरांसह गोठ्यांचे नुकसानअलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घर, गोठे यांचे नुकसान झाले आहे, तर तीन जनावरे मृत झाली. सोमवारी गोरेगाव येथे एक झाड पडल्याने दोघे जखमी झाले आहेत. प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.तळा येथे तीन जनावरांना प्राण गमवावा लागला. खालापुरात दोन, तर माणगावात एका घराचे नुकसान झाले. अलिबागमध्ये एका कच्च्या घरालाही फटका बसला आहे.