शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 7:54 AM

राज्यभरात ‘रिटर्न टू वाइल्ड’ उपक्रम

- श्रीकिशन काळेपुणे : प्राण्यांची तस्करी होत असल्यास वनविभागाकडून ते प्राणी जप्त केले जातात. काही ठिकाणी रस्त्यात किंवा इतर ठिकाणी जखमी अवस्थेत प्राणी आढळतात. त्यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरी (अधिवासात) पाठविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील अशा प्राण्यांना ‘रिटर्न टू वाइल्ड’ या उपक्रमाद्वारे पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे.राज्यात विविध ठिकाणी प्राण्यांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडले जाते. अनेकदा शासकीय यंत्रणेच्या कात्रीत हे प्राणी अडकतात आणि त्यांचे अधिवासात जाणे रखडते. त्यामुळे आता मुख्य प्रधान वनसंरक्षक (वाइल्ड) सुनील लिमये यांच्या पुढाकाराने अशा प्राण्यांना अधिवासात सोडण्यासाठी खास समिती बनवली आहे. त्यामध्ये रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमिया, वनसंरक्षक (वन्यजीव, पुणे) बी. रमेश आणि युवराज पाटील यांचा समावेश आहे. या समितीला कॅप्टन वाइल्ड कमिटी असे नाव दिले आहे.नेहा पंचमिया म्हणाल्या, ‘सध्या सर्व राज्यांतील वनविभागांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्राण्यांची माहिती व संख्या देण्यास सांगितले आहे. त्यासाठी ऑनलाइन सिस्टीम टूल विकसित केले असून, त्यावर सर्वजण माहिती अद्यावत करत आहेत.राज्यातील सर्व प्राण्यांना पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासामध्ये सोडण्यात येईल. सरपटणारे प्राणी, कासव, दुर्मीळ प्रजाती आदी प्राण्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.- नेहा पंचमिया, संस्थापक अध्यक्ष, रेस्क्यू, पुणेकासव विमानाने हक्काच्या घरीकाही महिन्यांपूर्वी पुणे वनविभागाने दुर्मीळ जातीचे कासव व पाली पकडल्या होत्या. या कासवांचा अधिवास हा आसाम येथील होता. त्या कासवांना आपल्याकडील हवामान मानवत नाही. म्हणून त्यांना खास विमानाने आसामला पाठविण्यात आले. पुणे विभागाने राबविलेला हा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला