शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संयम अन् शांततेचा संदेश देणारा पवित्र रमजान

By admin | Updated: June 8, 2017 03:25 IST

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन १३ दिवस पुर्ण झालेले आहेत.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन १३ दिवस पुर्ण झालेले आहेत. रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवावा, असे सांगितलेले आहे. कुराणाचे पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते. संयमाचा महिना अशीही रमजानची ओळख आहे. यामध्ये मुस्लिम एकमेकांकडे इफ्तारचे आयोजन करत आहेत. त्याच बरोबर गरजूंना मदत केली जाते. ज्याच्यावर अल्लाची कृपा आहे त्यांनी सर्व साध्य केले असे मानले जाते. तुम्हाला स्वत:ला एक दिवस अल्लासमोर हजर व्हायचे आहे किंवा अल्ला सतत आपल्याजवळ असल्याचा विश्वास बाळगावा. त्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला पूर्णत्व येत नाही. अल्लावरील श्रद्धा व अल्लाची कृपा या दोन गोष्टींच्या जीवनात महत्वाच्या असतात. अल्लाची कृपा माणसाला सत्कार्याची प्रेरणा देते व अपराध्यांच्या भयानक परिमाणाच भय त्याला अल्लाचा कोप होण्यापासून दूर ठेवते. आपण अल्लाच्या कोपापासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच अल्लाची भक्ती म्हणतात. अल्लाहने कुरआनात म्हटले आहे की, पालनकर्त्या समोर उभे राहण्याचे भय बाळगले आणि वाईट इच्छेपासून मनाला दूर ठेवले की, स्वर्ग त्याच ठिकाणी निर्माण होतो. रमजानच्या पवित्र महिन्यात जो रोजा ठेवला जातो. त्यामुळे माणसातील प्रबळ अशा स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण मिळवता येते. पहाटेच्या सहेरी नंतर ते रोजा सोडण्याच्या काळात मनुष्य तहानलेला, भुकेला असतो. अशा व्यक्तीमध्ये संयम आणि सहन शक्ती याच बरोबर अल्लाबाबतची श्रद्धाही निर्माण होत असते. अशा प्रकारे रोजा रोजा हा मनुष्याला स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. हिच शक्ती अल्लाबाबतची भक्ती आणि श्रद्धा निर्माण करते. म्हणूनच नमाज व रमजानच्या उपवासामध्ये एका विशिष्ट वेळी खाणेपिणे करायला लावणे व एका विशिष्ट वेळी ते सोडायला लावण्याची शिस्त निर्माण केली गेली आहे, असा हा रमजान महिना व या महिन्यातील रोजे याचे महत्व आहे.