शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

इतिहासाचे राजवैभव भंगारात

By admin | Updated: May 30, 2014 09:06 IST

अनिल साठे , भिंगार माणूस इतिहासाचा विचार करतो, तेव्हा तो माणसाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

 अनिल साठे , भिंगार माणूस इतिहासाचा विचार करतो, तेव्हा तो माणसाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. माणसाप्रमाणे एखाद्या हत्तीला, वृक्षाला,दगडालाही भूतकाळ असतोच. प्राणीशास्त्राच्या दृष्टिने इतिहास, वनस्पतीशास्त्रज्ञाच्या दृष्टिने वृक्षाचा भूतकाळ आणि भूवैज्ञानिकाच्या दृष्टिने दगडाचे जुने स्वरुप ह्याही गोष्टी अर्थपूर्ण आहेत. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणार्‍या वास्तुंचा अनमोल ठेवा, इतिहास प्रेमींसाठी संशोधनाकरीता महत्त्वाचा दुवा असतो. मात्र हा दुवाच भिंगारमध्ये भंगारात गेला आहे. जुन्या काळात राजवैभवात असलेले वाडे, राजवाडे नामशेष होताना पाहायला मिळत आहेत. ते उभारताना भौगोलिक परिसराचा अभ्यास करून इमारतीचा ढाचा, बारीक कलाकुसर करीत भव्य वाडे, राजवाडे उभारले जात होते. काळानुसार, बदलेल्या परिस्थितीनुसार त्यातील अनेक वास्तू नेस्तनाबूत झाल्या आहेत. अशाच एका वास्तुचे सागवानी लाकडाचे अवशेष एका भंगाराच्या दुकानात पाहायला मिळाले. त्यातील काही वस्तुंचे अवशेष भंगारात पाहायला मिळाले आहेत. संशोधन आणि संरक्षण ही पुरातत्त्व खात्याची अविभाज्य अंगे आहेत. पुरातत्त्व विभागाने असा अमूल्य ठेवा जतन करून संग्रहित केल्यास इतिहासासोबत कलाही जीवंत राहील. इतिहासाचे राजवैभव भंगारात जात असल्यामुळे संशोधनाच्या संधीलाही संशोधक मुकणार आहेत. भिंगार शहरालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानात सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वाड्याचे दरवाजे आणि खिडक्या, खांब, महिरप असलेल्या कमानी, कठडे, नक्षीकाम असलेल्या लाकडी पट्ट्या, लाकडी नक्षीदार छत, असे अनेक सागवान लाकडाचे अवशेष भंगारामध्ये पडलेले आहेत. या भंगार विक्रेत्यास त्या वाड्याबद्दल किंवा त्याच्या इतिहासबद्दल माहिती असण्याचे कारण नाही. त्या अवशेषामध्ये दहा बाय साडेपाच फुटाच्या सागवानी लाकडावर नक्षीकाम केलेले दार बरेच काही सांगून जाते. शत्रुला नेस्तनाबुत करणं हे तर युद्धात घडतेच. पण आक्रमकाकडून पराभूत राज्याची राजधानी नष्ट करणं किंवा राजवाडा जाळणं, हे अनेक वेळा घडलं आहे. अशा ठिकाणी आजघडीला केवळ अवशेष उरले आहेत. या अवशेषावरून त्या वैभवी काळाची कल्पना येते. काही ठिकाणी नव्यानं वास्तू उभारल्या गेल्या आहेत. अनेक वेळा वारसदाराची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अशा वास्तू विक्रीस निघाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु या इतिहासाची साक्ष देणार्‍या मौल्यवान वास्तुंचे जतन-संवर्धनाची जबाबदारी न घेतल्याने नामशेष होत आहेत. दोन वाडे पाडताना त्यातील एका वाड्याचे अवशेष विकत घेतले होते. जुन्या सागवानी वस्तू यापूर्वीही आणून विकलेल्या आहेत. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ग्राहक मिळाले नाहीत, तर ते जीवापाड जतन करून ठेवतो. -फारुक, भंगारविक्रेता गतकाळातील ही कलाकुसर अमूल्य ठेवा आहे. अशी कला आता पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. कलेच्या खजिन्याचे संवर्धन होणे, त्याचा संग्रह करणे गरजेचे आहे. इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तुचे अवशेष जर भंगारात पाहायला मिळत असतील तर भारतीय संस्कृती टिकण्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. -अशोकानंद महाराज कर्डिले, वारकरी संप्रदायातील अभ्यासक