शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
2
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
3
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
6
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
7
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
8
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
9
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
10
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
11
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
12
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
13
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
14
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
15
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
16
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
17
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
18
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
19
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
20
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला

निसर्गाचा इतिहास शिकविला जावा

By admin | Updated: January 20, 2015 00:59 IST

निसर्गाविषयीचे संस्कार रुजविण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमामध्ये ‘निसर्गा’चा इतिहास शिकविला गेला पाहिजे.

पुणे : निसर्गाविषयीचे संस्कार रुजविण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमामध्ये ‘निसर्गा’चा इतिहास शिकविला गेला पाहिजे. योग्य वेळी धोक्याचा इशारा मिळाला, तरच त्याचा उपयोग होऊ शकेल; अन्यथा निसर्गदेखील इतिहासजमाच होईल, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.वसुंधरा महोत्सव व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने सोमवारी आयोजित ‘तिसऱ्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलना’चे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी तसेच गुजराती-केळवणी मंडळाचे पदाधिकारी हरिशभाई शहा, एच. व्ही. सरदेसाई महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पाठारे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘फार पूर्वीच्या काळी ‘पर्यावरण’ हा शब्द अस्तित्वात नव्हता. मनुष्य हाच एक निसर्गाचा भाग होता. निसर्गात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे निसर्ग आणि मानवाचे एक अतूट नाते तयार झाले होते. मात्र, काळानुरूप वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला. मनुष्य निसर्गाचा गुलाम किंवा मालक नसून मित्र आहे. निसर्ग म्हणजे मनुष्याला मिळालेली ठेव आहे. मात्र, भांडवलशाही व्यवस्थेला विरोध करायचा की, त्या व्यवस्थेच्या पोटात शिरायचे किंवा त्यावर स्वार होत पुढे जायचे, हा तात्त्विक मुद्दा आहे.’’ या कार्यक्रमात नीलिमा बोरवणकर लिखित ‘गाज’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.(प्रतिनिधी)४ पर्यावरणाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून शालेय अभ्यासक्रमात निसर्गाचा इतिहास शिकविण्याची अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. पुणे : पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे केवळ बाह्य पर्यावरणाची हानी नसते. बाह्य पर्यावरणाबरोबरीनेच आंतरिक पर्यावरण, मानसिक संतुलन, शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देऊन खरा विकास कसा साधता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. ऊर्जा कधीच वाढत नाही, तिचा कायम ऱ्हासच होतो. स्वत:च्या गरजा पुरवण्यासाठी आणि विकास साधण्याच्या नावाखाली विविध ऊर्जांचा अमाप वापर करून विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप यांनी व्यक्त केले. पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते. शहर हीच एक पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या आहे. उद्योगीकरणामुळे शहरीकरण होते. शहरीकरण झाले की गर्दी वाढते, त्यामुळे लोकांच्या गरजा निर्माण होतात. त्या गरजा पुरवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर वाढतो आणि अर्थातच याचा परिणाम कचऱ्याची वाढ होते. तसेच पुनर्वापर म्हणजे इको फ्रेंडली नाही. प्लॅस्टिकचा पुनर्वापर होतो. परंतु, मुळातच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापरच का करावा, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.आपल्याला जे फुकट मिळतंय ते आपण वाया घालवतो आणि ज्या संपुष्टात येणाऱ्या ऊर्जा आहेत, त्याचा अतोनात वापर करून त्या संपवायच्या मागे लागलो आहोत. मानवाची विकासनीती ही पर्यावरणस्नेही व जीवनशैली निसर्गस्नेही असायला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.