शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:46 IST

हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे.

मुंबई- रिक्षाचालकांचा उद्दामपणा, मनमानी कारभार सर्वसामान्य मुंबईकर नेहमीच अनुभवतात. ऑफिसला जाताना-येताना नेहमीच रिक्षाचालकांच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच हिंगोलीच्या डीवायएसपींनाही याचा अनुभव आला आहे. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे. मुंबईतील अंधेरी स्थानकावर आपण पोलीस असल्याची ओळख त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याचा अनुभव त्यांना आला.

महिला प्रवाशांचा अपमान पोलिसांकडूनही कसा केला जातो, याची प्रचिती सुजाता पाटील यांना आली. समोर पोलीस बसलेले असतानाही रिक्षाचालक कसे वागतात त्याचा अनुभव आल्याचं सुजाता पाटील यांनी सांगितलं. ओळख न सांगता पोलीस महिलांची मदत करतात का ते पाहायचं होतं, पण पोलिसांनी मदतीऐवजी अपमान केला. महिला कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला.

 फेसबुक पोस्टमध्ये सुजाता पाटील यांनी म्हंटलं आहे की, ''आज २४ march 2018.....सकाळी 15 तास प्रवास करुन भोपाळ ते मुंबई गाठली, पंजाब मेल ३ तास लेट होती. खुप थकले होते. पाय़ fracture . मुलगी आजारी जीव कासावीस झाला होता. लंगडत लंगडत बॅगा ओढत सकाळी १० वा अंधेरी गाठली. अंधेरीत(प)  नेहमीच रिक्षावाले प्रवाशाना छळवणुक करतात. नेहमीप्रमाणे रिक्षावाले भाडे नकार. कोणाला काही देणंघेण नाही. समोर पोलीस शिपाई १०० फूट खुर्चीत बसुन,  हा सगळा उतमात पोलीसांसमोर सुरू.  मी माझी ओळख सांगायची नाही ठरवलंच होतं.  पोलीस चौकीत पोलीस मदत मागता पोलीस शिपाई धनवडे व शिर्के डि.एन.नगर पोलीस. आरामात बसुन. ईशारा केला पण पोलीस सांगतो येणार नाही.  बॅगा ओढत चौकीत जावुन रिक्षावाले भाडे नाकारत आहेत सांगता , ऑन duty वरील पोलीस शिपाई दोघानी १० मिनीटे उनमत बोलुन माझा भरभरुन  अपमान केला. मला क्षणभर काहीच कळेना.  एका प्रवाशी महिलेचा अपमान कशाप्रकारे केला जावू  शकतो आज अनुभव घेतला. डोळे पानावले. अजूनही समजत नाही.  महिला कधी सुरक्षीत होतील . .हा होता माझा आजचाएका प्रवासी महिलैचा कटु अनुभव. जयहिंद. .''

रिक्षाचालकांची तक्रार पोलिसाकडे करायला गेले, त्यावेळी पोलीस उद्दामपणे बोलत होते, नाव विचारल्यावर, तुला नाव काय करायचं आहे, तू काय वाकडं करणार आहेस म्हणाले, असा प्रश्न पोलिसांनीच विचारला. मी नोकरी पणाला लावून फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सरकारने मला काहीही शिक्षा दिली तरी मी तयार आहे. मला मदत मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना कशी मदत मिळेल? माझं डिपार्टंमेंट सुधारावं याच हेतूने मी माझी व्यथा फेसबुकवर मांडली, अशी प्रतिक्रिया सुजाता पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सुजाता पाटील यांच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई