शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 16, 2016 08:06 IST

हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे. या देशात हिंदू असणे हा अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत, असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडले आहे. तसेच हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणीही ठोकणार नाही, हिंदूना एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल, असेही उदअधव यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात. मात्र अशीच धमकी जर मुसलमान व अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये सत्तेसाठी पीडीपीशी युती करणा-या भाजपा सरकारवर उद्धव यांनी टीकास्त्र सोडले आहे. ' जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे,' अशी टीका उद्धव यांनी केली आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- कोणीही उठतो आणि हिंदुस्थानच्या कानफटात मारतो असे नेहमीच घडताना दिसत आहे. हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण हिंदुस्थानात शरीयत कायदा लागू करू असे या मंडळींनी सीरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्या खाली पडत असतात. 
- नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘इसिस’ किंवा अन्य दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारची धमकी येथील मुसलमानांच्या बाबतीत वा अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते. मुसलमानांच्या वा ख्रिश्‍चनांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा गर्जना सरकारी पातळीवर झाल्या असत्या व अल्पसंख्याक म्हणून या लोकांच्या सुरक्षेसाठी चिंतामय उसासे टाकण्याची राष्ट्रीय स्पर्धाच लागली असती. 
- कश्मीरातील हिंदू पंडितांचे जे शिरकाण गेली पंचवीसेक वर्षे सुरू आहे तो तरी काय प्रकार आहे? तिथेही पद्धतशीरपणे हिंदूंचा खात्माच झाला आहे व जे हिंदू पंडित वाचले आहेत ते आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे जगत आहेत. जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे, पण तिथे आजही हिंदूंना प्रवेश नाही व हिंदूंनी पुन्हा परत यावे यासाठी विशेष प्रयत्न नाहीत. 
- या देशात हिंदू असणे हा जणू अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत. म्हणूनच स्वराज्यातील हिंदूंची दुर्दशा व असुरक्षित जगणे राज्यकर्त्यांना दिसत नाही. हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल!