शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

By admin | Updated: July 23, 2015 16:24 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत. मात्र, मूर्तीवरील धार्मिक विधी थांबविणे शक्य नसल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतल्यामुळे, हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरात चिंतेचे वातावरणपसरले आहे. तब्बल २२ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीचे धार्मिक विधी बुधवारी सकाळपासून सुरू झाले. मात्र, हिंदू जनजागृती समितीने विरोध केल्यामुळे व विषय धार्मिकदृट्या संवेदनशील असल्याने आम्ही ही प्रक्रिया करण्यासाठी येऊ शकत नसल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता श्रीपूजक मंडळाला दूरध्वनीवरून कळवले. हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पाठविलेल्या या पत्रामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात येणारे अधिकारी एम. के. सिंग यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना दूरध्वनीवरून या प्रक्रियेसाठी कोल्हापूरला सध्या तरी जाऊ नका, असा आदेश दिला आहे. ही माहिती पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी करवीरनिवासिनी हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी सांगितली. त्यानंतर श्रीपूजक मंडळातर्फे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वैकल्पिक वाद निवारण केंद्रात झालेल्या तडजोडीत न्यायालयाने अंबाबाई मूर्तीवर ३० आॅगस्टपूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जावी, असा आदेश दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रासायनिक संवर्धन ही प्रक्रिया अधार्मिक असती तर छत्रपती, शंकराचार्य, धर्माचार्य, शास्त्री, पंडित त्यात सहभागी झाले नसते. विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आम्ही वारंवार चर्चेसाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे, हे कार्य देवीच पार पाडेल. (प्रतिनिधी)अंबाबाईची मूर्ती हा सर्वांसाठीच श्रद्धेचा विषय आहे. त्याचे गांभीर्य समजून घेत मूर्तीवरील प्रक्रियेला विरोधच होता कामा नये. आता धार्मिक विधी सुरू झाल्याने विषय थांबविता येणार नाही. उद्याच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी आणि श्रीपूजकांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला जाईल.- अमित सैनी, जिल्हाधिकारी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला विरोध होणे हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी कोल्हापूरला जाणे थांबवा, असे सांगितले आहे. एम. के. सिंग, अधिकारी, पुरातत्व खातेनवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी : नाझरेहिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला विरोधाचे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘अंबाबाईच्या मूर्तीवर १९५५ मध्ये वज्रलेप झाला आहे. त्यानंतरही मूर्तीची सातत्याने झीज झाली शिवाय मूर्ती भंग पावली आहे. तिच्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली तर मूर्तीमधील सत्त्व तेज लुप्त होईल. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया करू नये. सध्या असलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात यावी.’ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हा विषय पुढे मार्गी लागला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती त्यांना मेलद्वारे पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही श्रीपूजकांनी सांगितले.