शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

By admin | Updated: July 23, 2015 16:24 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत. मात्र, मूर्तीवरील धार्मिक विधी थांबविणे शक्य नसल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतल्यामुळे, हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरात चिंतेचे वातावरणपसरले आहे. तब्बल २२ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीचे धार्मिक विधी बुधवारी सकाळपासून सुरू झाले. मात्र, हिंदू जनजागृती समितीने विरोध केल्यामुळे व विषय धार्मिकदृट्या संवेदनशील असल्याने आम्ही ही प्रक्रिया करण्यासाठी येऊ शकत नसल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता श्रीपूजक मंडळाला दूरध्वनीवरून कळवले. हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पाठविलेल्या या पत्रामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात येणारे अधिकारी एम. के. सिंग यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना दूरध्वनीवरून या प्रक्रियेसाठी कोल्हापूरला सध्या तरी जाऊ नका, असा आदेश दिला आहे. ही माहिती पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी करवीरनिवासिनी हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी सांगितली. त्यानंतर श्रीपूजक मंडळातर्फे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वैकल्पिक वाद निवारण केंद्रात झालेल्या तडजोडीत न्यायालयाने अंबाबाई मूर्तीवर ३० आॅगस्टपूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जावी, असा आदेश दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रासायनिक संवर्धन ही प्रक्रिया अधार्मिक असती तर छत्रपती, शंकराचार्य, धर्माचार्य, शास्त्री, पंडित त्यात सहभागी झाले नसते. विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आम्ही वारंवार चर्चेसाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे, हे कार्य देवीच पार पाडेल. (प्रतिनिधी)अंबाबाईची मूर्ती हा सर्वांसाठीच श्रद्धेचा विषय आहे. त्याचे गांभीर्य समजून घेत मूर्तीवरील प्रक्रियेला विरोधच होता कामा नये. आता धार्मिक विधी सुरू झाल्याने विषय थांबविता येणार नाही. उद्याच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी आणि श्रीपूजकांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला जाईल.- अमित सैनी, जिल्हाधिकारी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला विरोध होणे हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी कोल्हापूरला जाणे थांबवा, असे सांगितले आहे. एम. के. सिंग, अधिकारी, पुरातत्व खातेनवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी : नाझरेहिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला विरोधाचे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘अंबाबाईच्या मूर्तीवर १९५५ मध्ये वज्रलेप झाला आहे. त्यानंतरही मूर्तीची सातत्याने झीज झाली शिवाय मूर्ती भंग पावली आहे. तिच्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली तर मूर्तीमधील सत्त्व तेज लुप्त होईल. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया करू नये. सध्या असलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात यावी.’ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हा विषय पुढे मार्गी लागला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती त्यांना मेलद्वारे पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही श्रीपूजकांनी सांगितले.