शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

नाशिक, पैठणमध्ये पुरामुळे हायअलर्ट

By admin | Updated: August 3, 2016 06:02 IST

सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक, पैठणमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला

मुंबई / पुणे : सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक, पैठणमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कृष्णा, पंचगंगेसह इतर मोठ्या नद्यांनी धोक्याची रेषा ओलांडली आहे. याशिवाय छोट्या नद्या, ओढेही दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या २४ तासांत कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.नाशिकमधील दहा धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह तीन तालुक्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात गोदावरीकाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथक तैनात केले आहे. पुराच्या पाण्यामुळे औरंगाबाद-नाशिक महामार्ग बंद झाला असून सायंकाळी वाहतूक ठप्प झाली होती. नाशकात तीन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चांदोरीत ११ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कोपरगावातही (नगर) गोदाकाठी डाऊच बुद्रुक येथेही पुराच्या पाण्यात २२ जण अडकले आहेत. संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, पालखेड, नांदूरमधमेश्वर, भावली, मुकणे, कडवा, आळंदी, भोजापूर व चणकापूर या दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक व जिल्ह्यातील शाळेला सुटी जाहीर केली. पालकमंत्री गिरीश महाजन तातडीने नाशकात दाखल झाले आहेत. मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. बीड, जालना नांदेड, परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घाटमाथ्यावर मुसळधारघाटमाथ्यावरील दावडी २२०, शिरगाव, ताम्हिणी २१०, डुंगरवाडी १७०, अम्बोणे, खांद १६०, भिरा, वाणगाव, भिवपुरी १५०, कोयना (पोफळी) १४०, लोणावळा(टाटा) ११०, शिरोटा, कोयना (नवजा), वळवण, खोपोली १००, लोणावळा(आॅफिस) ९०, ठाकूरवाडी ७०मिमी पाऊस झाला आहे़