शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नाशिक, पैठणमध्ये पुरामुळे हायअलर्ट

By admin | Updated: August 3, 2016 06:02 IST

सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक, पैठणमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला

मुंबई / पुणे : सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक, पैठणमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कृष्णा, पंचगंगेसह इतर मोठ्या नद्यांनी धोक्याची रेषा ओलांडली आहे. याशिवाय छोट्या नद्या, ओढेही दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या २४ तासांत कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.नाशिकमधील दहा धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह तीन तालुक्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात गोदावरीकाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथक तैनात केले आहे. पुराच्या पाण्यामुळे औरंगाबाद-नाशिक महामार्ग बंद झाला असून सायंकाळी वाहतूक ठप्प झाली होती. नाशकात तीन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चांदोरीत ११ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कोपरगावातही (नगर) गोदाकाठी डाऊच बुद्रुक येथेही पुराच्या पाण्यात २२ जण अडकले आहेत. संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, पालखेड, नांदूरमधमेश्वर, भावली, मुकणे, कडवा, आळंदी, भोजापूर व चणकापूर या दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक व जिल्ह्यातील शाळेला सुटी जाहीर केली. पालकमंत्री गिरीश महाजन तातडीने नाशकात दाखल झाले आहेत. मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. बीड, जालना नांदेड, परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घाटमाथ्यावर मुसळधारघाटमाथ्यावरील दावडी २२०, शिरगाव, ताम्हिणी २१०, डुंगरवाडी १७०, अम्बोणे, खांद १६०, भिरा, वाणगाव, भिवपुरी १५०, कोयना (पोफळी) १४०, लोणावळा(टाटा) ११०, शिरोटा, कोयना (नवजा), वळवण, खोपोली १००, लोणावळा(आॅफिस) ९०, ठाकूरवाडी ७०मिमी पाऊस झाला आहे़