शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

चेरापुंजी नव्हे, पाथरपुंजमध्ये सर्वाधिक पाऊस; देशात पहिल्या पाचमध्ये साताऱ्यातील ४ ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:07 IST

नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात.

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. मात्र, यंदा त्यात बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जादा पाऊस पडल्याची नोंद जिल्ह्यातील चार ठिकाणी झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील पाथरपुंज हे सर्वाधिक पावसाची नोंद झालेले ठिकाण बनले आहे. येथे जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर चेरापुंजीत ५,९३८.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

वाई तालुक्यातील बलकवडी धरणाच्या वरील बाजूस असणारे जोर येथे ६ हजार ९८९ मिलीमीटर, पाटण तालुक्यातील नवजा येथे ६ हजार २७२ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथील वालवण येथे ६ हजार ८४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे ६ हजार ४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कुठे आहे पाथरपुंज?कोयनानगरच्या नैऋेत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विश्ोष म्हणजे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत. येथे पडणाºया प्रचंड पावसाचे पाणी मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा ठरलेल्या वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावच्या पश्चिमेला आहे.

वाशिमला सर्वांत कमी पाऊसयंदा विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत सर्वाधिक म्हणजे १२४७.४७ मिमी पाऊस पडला. मात्र पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी अवघा ३७५.३ मिमी पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.पाटण तालुक्यातील पाथरपुंज या गावात नेहमी मोठा पाऊस होतो. यंदाही या ठिकाणी विक्रमी पाऊस झाला आहे. मात्र, हे पाणी कोयना धरणात जमा होत नाही.- संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग

टॅग्स :Rainपाऊस