शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शाळांचा बृहद आराखडा रद्द!

By admin | Updated: August 6, 2016 05:04 IST

शाळांचा बृहद आराखडा रद्दबातल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : राज्य शासनाकडून चार वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला शाळांचा बृहद आराखडा रद्दबातल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मान्यतेचे अनेक प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना डॉ.सतीश पाटील यांनी मांडली होती. यावर, तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये मराठी माध्यमांच्या २४०० हिंदी माध्यमाच्या ६२, उर्दू माध्यमांच्या १६६, इंग्रजी माध्यमांच्या ४२१९ व इतर माध्यमांच्या ४ अशा एकूण ६८५१ शाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार राज्यातील ग्रामीण भागामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांच्या परवानगी साठी गुगल मॅपिंगद्वारे ठिकाणे निश्चित करु न त्यानुसार गावांच्या लोकसंख्या बाबतचा निकष लक्षात घेऊन २०१२ मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांचा बृहत आराखडा तयार केला. राज्यात २०१२ पासून स्वयंअर्थसहाय्यित शाळा व्यवस्थापन अधिनियम अस्तित्वात आहे. त्याद्वारे ३६०० नवीन मराठी शाळांना परवानगी देण्यात आली आहे , तसेच गरज भासल्यास आणखी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना यापुढे परवानगी देण्यात येईल , मात्र मागील सरकारच्या बृहद आराखड्यानुसार ज्या नव्या २२२ शाळांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत त्यांना तशी गरज वाटलीच तरच निवडक व निकष पूर्ण करणाऱ््या शाळांनाच देण्यात येईल असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>५५ हजार कोटींनी काय साधले? : मुख्यमंत्रीराज्य सरकार शिक्षणावर दरवर्षी तब्बल ५५ हजार कोटी खर्च करते मात्र त्याप्रमाणात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात नाही, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. अनुदानित शाळांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे यापुढे ज्यांना खरोखरच समाजकार्य म्हणून स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु करु न चालवायची असेल त्यांनाच निकषानुसार परवानगी दिली जाईल. मात्र अनुदानावर डोळा ठेवून नव्या शाळा सुरु करता येणे शक्य नाही.>१९ हजार शिक्षक अतिरिक्त : राज्यात आताच १९ हजार शिक्षक अतिरिक्त ठरले असून नव्या शिक्षकांची त्यात भरती केल्यास हा आकडा २८ हजार शिक्षकांवर जाईल असे विनोद तावडे यांनी सांगितले. त्यामुळे नवीन शिक्षकांची भरती होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.