शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा बृहद आराखडा रद्द!

By admin | Updated: August 6, 2016 05:04 IST

शाळांचा बृहद आराखडा रद्दबातल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : राज्य शासनाकडून चार वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला शाळांचा बृहद आराखडा रद्दबातल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मान्यतेचे अनेक प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना डॉ.सतीश पाटील यांनी मांडली होती. यावर, तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये मराठी माध्यमांच्या २४०० हिंदी माध्यमाच्या ६२, उर्दू माध्यमांच्या १६६, इंग्रजी माध्यमांच्या ४२१९ व इतर माध्यमांच्या ४ अशा एकूण ६८५१ शाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार राज्यातील ग्रामीण भागामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांच्या परवानगी साठी गुगल मॅपिंगद्वारे ठिकाणे निश्चित करु न त्यानुसार गावांच्या लोकसंख्या बाबतचा निकष लक्षात घेऊन २०१२ मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांचा बृहत आराखडा तयार केला. राज्यात २०१२ पासून स्वयंअर्थसहाय्यित शाळा व्यवस्थापन अधिनियम अस्तित्वात आहे. त्याद्वारे ३६०० नवीन मराठी शाळांना परवानगी देण्यात आली आहे , तसेच गरज भासल्यास आणखी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना यापुढे परवानगी देण्यात येईल , मात्र मागील सरकारच्या बृहद आराखड्यानुसार ज्या नव्या २२२ शाळांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत त्यांना तशी गरज वाटलीच तरच निवडक व निकष पूर्ण करणाऱ््या शाळांनाच देण्यात येईल असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>५५ हजार कोटींनी काय साधले? : मुख्यमंत्रीराज्य सरकार शिक्षणावर दरवर्षी तब्बल ५५ हजार कोटी खर्च करते मात्र त्याप्रमाणात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात नाही, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. अनुदानित शाळांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे यापुढे ज्यांना खरोखरच समाजकार्य म्हणून स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु करु न चालवायची असेल त्यांनाच निकषानुसार परवानगी दिली जाईल. मात्र अनुदानावर डोळा ठेवून नव्या शाळा सुरु करता येणे शक्य नाही.>१९ हजार शिक्षक अतिरिक्त : राज्यात आताच १९ हजार शिक्षक अतिरिक्त ठरले असून नव्या शिक्षकांची त्यात भरती केल्यास हा आकडा २८ हजार शिक्षकांवर जाईल असे विनोद तावडे यांनी सांगितले. त्यामुळे नवीन शिक्षकांची भरती होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.