शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केदार यांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: December 24, 2014 00:50 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची नवीन चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिलेत.

जिल्हा बँक घोटाळा प्रकरण नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची नवीन चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिलेत. घोटाळ्यात सामील बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार, महाव्यवस्थापक अशोक चौधरी व इतर आरोपींना हा जोरदार दणका माणला जात आहे.यापूर्वी यशवंत बागडे यांनी घोटाळ्याची चौकशी करून २८ नोव्हेंबर २०१३ रोजी चौकशी अहवाल सादर केला होता. त्यात केदार व चौधरी यांच्यासह एकूण आठ जणांना घोटाळ्यासाठी जबाबदार ठरविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल आरोपींना सुनावणीची संधी दिली नसल्याचे कारण नोंदवून फेटाळला होता. तसेच, घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अ‍ॅड. योगेंद्र खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सरकारी वकील भारती डांगरे यांनी बुधवारी घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी ही बाब लक्षात घेता चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ ठरवून दिला. सुनील केदार व इतर आरोपींकडून घोटाळ्याची रक्कम व व्याज पकडून १५६ कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशा विनंतीसह बडेगाव (सावनेर) येथील शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे. शासनाने आदेशावर अंमलबजावणी न केल्यास परत न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र याचिकाकर्त्यांना दिले आहे.बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. परंतु, कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही. विशेष लेखापरीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे लेखापरीक्षण करून २९ एप्रिल २००२ रोजी केदार, चौधरी व इतरांविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, तर जिल्हा बँकेतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)फौजदारी खटला एक वर्षात निकाली काढण्याचे आदेशजिल्हा बँक घोटाळ्यासंदर्भात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी-१ न्यायालयात दाखल खटला (आरसीसी/१४७/२००२) कोणत्याही परिस्थितीत एक वर्षामध्ये निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. घोटाळ्यातील अनेक आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालविण्यासाठी जेएमएफसी न्यायालयात अर्ज दाखल करून त्याची माहिती कळविण्याची सूचनाही उच्च न्यायालयाने केली आहे. तूर्तास अन्य आरोपींवरील खटल्याच्या कारवाईला वेग येणार आहे. सीआयडी पोलिसांनी २२ नोव्हेंबर २००२ रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींमध्ये सुनील केदार, अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर या ११ जणांचा समावेश आहे.अशी आहे चौकशीजिल्हा बँक घोटाळ्याची चौकशी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत होणार आहे. चौकशीदरम्यान किती रुपयांचा घोटाळा झाला व घोटाळ्यासाठी कोणकोण किती प्रमाणात जबाबदार आहे हे शोधून काढण्यात येईल. तसेच, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. जबाबदारी निश्चित झाल्यानंतर घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू होईल.