शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सुधारित मनोधैर्य योजनेवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला पीडितांसाठीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:09 IST

बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांना प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुधारित योजनेवर शिक्कामोर्तब करीत एक महिन्यात ही योजना अधिसूचित करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.

मुंबई : बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांना प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुधारित योजनेवर शिक्कामोर्तब करीत एक महिन्यात ही योजना अधिसूचित करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांसाठी आॅक्टोबर २०१३मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. मात्र या मूळ योजनेत पीडितांसाठी नुकसानभरपाई म्हणून त्रोटक रक्कम मंजूर करून सरकारने त्यांची परवडच केली. या योजनेला आव्हान देणाºया अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. तर काही पीडितांनी ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली. या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.नव्या व सुधारित मनोधैर्य योजनेसाठी सरकारने खूप वेळ खर्च केला आहे. प्रस्तावित सुधारित योजनेबाबत आम्ही समाधानी आहोत, असे म्हणत न्यायालयाने सुधारित मनोधैर्य योजनेवर शिक्कामोर्तब केले. एका महिन्यात सुधारित योजना अधिसूचित करण्याचे निर्देशही राज्य सरकारला या वेळी दिले.सरकारने ही प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयानेही सरकारची ही विनंती मान्य केली. त्रुटीविरहित आणि आदर्शवत मनोधैर्य योजना तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी दोन विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्ती केली होती. त्यात महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव व याचिकाकर्त्या एनजीओचा समावेश होता. या समितीने दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात १६ पानांचा अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशी सरकारने मान्य केल्याची माहिती महाअधिवक्त्यांनी उच्च न्यायालयाला दिली....तर रक्कम परत घेणारप्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेनुसार, बलात्कारानंतर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या वारसदारांना १० लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल. तसेच बलात्कार किंवा अ‍ॅसिडहल्ल्यामुळे एखाद्या महिलेला कायमचे मानसिक किंवा शारीरिक अधुत्व आल्यास तिलाही १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. घटना घडल्यानंतर संबंधित महिलेला तत्काळ ३० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. मात्र संबंधित महिलेने खटल्यात साक्ष फिरवल्यास तिला देण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम तिच्याकडून परत घेण्यात येईल.

टॅग्स :Courtन्यायालय