शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

वक्फ बोर्डाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाला हायकोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 4:59 AM

निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्यास याचिकाकर्ते ‘निवडणूक याचिका’ दाखल करू शकतील, अशी मुभा खंडपीठाने दिली.

औरंगाबाद : महाराष्टÑ वक्फ बोर्डाच्या ‘मुतवल्ली संवर्गातील’ पुरुष आणि महिला अशा दोन सदस्यांच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या ‘जनहित याचिके त’ हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. ए.जी. घारोटे यांनी शुक्रवारी नकार दिला. याप्रकरणी अल्पसंख्याक विभागाचे मुख्य सचिव, निवडणूक अधिकारी आणि वक्फ बोर्डाचे सीईओ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.सदर निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्यास याचिकाकर्ते ‘निवडणूक याचिका’ दाखल करू शकतील, अशी मुभा खंडपीठाने दिली. पुणे येथील महाराष्टÑ वक्फ लिबरेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीमुल्ला आणि निवृत्त मुख्य आयकर आयुक्त ए.जी. खान (पुणे) यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या निवडणुकीला स्थगिती मागणारी जनहित याचिका त्यांनी दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे होते की, संपूर्ण महाराष्टÑात अंदाजे २५ हजार नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत, ज्यावर मुतवल्ली आणि कार्यकारी नियुक्त आहेत. ज्या संस्थांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे त्या वक्फ संस्थांचे मुतवल्लीच या निवडणुकीत मतदार होण्यासाठी पात्र समजले जातात. अशा फक्त १३४ मतदारांची यादी तयार करून सदर निवडणूक घेण्यात येणार होती. मागील निवडणुकीत या मतदारसंघात ८५० मतदार होते. यावर्षी मात्र पात्र उमेदवारांना डावलून केवळ १३४ मतदारच मतदान करणार होते. सदर निवडणूक वक्फ कायद्याचा भंग करून घेण्यात येणार होती, म्हणून जनहित याचिका दाखल करीत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.