शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोलीस आधुनिकीकरण कारवाईबद्दल शपथपत्र दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 01:38 IST

चार आठवड्यांची मुदत : कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासह अन्य मागण्यांवर याचिका

खुशालचंद बाहेती औरंगाबाद : पोलीस आधुनिकीकरणासंबंधी दाखल जनहित याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर राज्य शासनाने ४ आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी या विषयावर आदेश देऊनही अद्याप उत्तर का सादर केले नाही, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.

पोलीस दलातील लोकांची संख्या वाढवावी, कामाची वेळ ८ तास करावी. यासह अन्य मागण्या करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेल्या वर्षी दखल करण्यात आली होती. पोलिसांना ८ तासांच्या कामाचे नियोजन करण्यामागे त्यांच्यावरील व्यावसायिक ताण कमी करून मानसिक आरोग्य राखणे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याच्या पुष्ठ्यर्थ अनेक अभ्यास अहवालांचे हवाले देण्यात आले आहेत. साप्ताहिक सुटी न मिळता अनेक तास कराव्या लागणाºया कामामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो व त्याचा बळी जातो, असा निष्कर्ष या अहवालात असल्याचा दावा करण्यात आला आहे. ८ तासांची ड्यूटी हा प्रयोग केरळमध्ये यशस्वी झाला असून, महाराष्ट्रात तो लागू करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

पद्मनाभय्या समितीने २००० साली पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीस दलात जास्तीत जास्त पोलीस उपनिरीक्षकांची भरती करावी, अशी शिफारस केली असतानाही राज्याने २०१७-१८ मध्ये एकाही पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक झाली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आणि न्या. एन.आर. बोरकर यांनी या मुद्यावर चार आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश शासनास दिला आहे.जनहित याचिकेतील मुद्दे1)राज्यात प्रतिलक्ष जनसंख्येच्या प्रमाणात १४५ पोलिसांची पदे आहेत. संयुक्त राष्ट्रांची किमान २२५ ची शिफारस आहे.2)राज्यात मंजूर असलेल्या २,४१,८१३ पदांपैकी २,१३,३८२ पदे भरण्यात आली असून, ३० हजार पदे रिकामी आहेत.3)भारतीय पोलीस सेवेच्या ३१७ मंजूर पदांपैकी फक्त २५५ पदे भरलेली आहेत.4)राज्य व केंद्राने २०१८-१९ सालात आधुनिकीकरणासाठी मंजूर केलेल्या ९१.३५ कोटी निधीपैकी फक्त ९ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय