शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

हेपॅटायटीस, टायफॉइडच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे

मुंबई : पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांतच हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. २०१५ मध्ये हेपॅटायटिसचे १ हजार १८४ रुग्ण आढळले होते. यंदा जानेवारी ते मे दरम्यान ६५७ रुग्ण आढळले आहेत. टायफॉईडचे गेल्यावर्षी १ हजार ३२४ रुग्ण आढळले होते. तर, यंदा आजपर्यंत ५७९ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी लेप्टोच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे यंदा लेप्टोला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. प्रत्येक वॉर्डमधील प्राण्यांची व्हेटर्नरी डॉक्टरकडून तपासणी करण्याची आणि लसीकरणा मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तबेला मालकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका सहआयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली. (प्रतिनिधी)>पावसाळ्यासाठी पालिका सज्जडासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने धूर फवारणीला सुरुवात केली आहे. २७ वॉर्डमध्ये फवारणी सुरू आहे. झोपडपट्टी भागात अडगळीत टाकलेल्या वस्तू, टायर यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. खासगी मालकीच्या ३ हजार ६१८ पाण्याच्या साठ्यांची तर, महापालिका जागांमधील २ हजार ४०६ पाण्याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी अथवा अडगळ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले. >रुग्णालयात २ हजार २२३ खाटा राखीव पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, हेपॅटायटिसच्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे २ हजार २२३ खाटा पावसाळी आजारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. रुग्ण वाढल्याने महापालिका रुग्णालयांत रुग्णांना जमीनवर गादी घालून ठेवावे लागते. हे होऊ नये म्हणून आधीच खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचबरोबर औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. >पावसाळ््यात दूषित पाणी आणि अन्न पदार्थांमुळे आजार होण्याचा धोका असतो. अन्न व औषध प्रशासनाने पाण्याचे आणि बर्फाचे नमुने यांची चाचणी सरू केली आहे. ८ नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या सुरु आहेत. अहवाल आल्यावर आणखी नमुने घ्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.- सुरेश अन्नपूर्णे, सहआयुक्त (अन्न) एफडीए