शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साडेअकरा लाख आदिवासींना प्रत्येकी ४ हजार रु.ची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:50 IST

लोकमतच्या पाठपुराव्याला यश; दोन हजार रोख, दोन हजाराचे रेशन

मुंबई : आर्थिक विवंचनेतील ११ लाख ५५ हजार आदिवासींना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपये किमतीचे रेशन असे चार हजार रुपयांचे खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यासाठी आदिवासी विकास विभागाला ४८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. लोकमतने या अनुदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला.यापूर्वी आदिवासींना खावटी कर्ज दिले जायचे पण आता ते अनुदान स्वरुपात असल्याने परत करावे लागणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने या वर्षापुरतेच हे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) हे अध्यक्ष असतील तर योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास हे अध्यक्ष असतील.यापूर्वी : आदिवासींना खावटी कर्ज दिले जायचे. आता : ते अनुदान स्वरुपात असल्याने परत करावे लागणार नाही. वर्षभरासाठी असेल अनुदानआदिवासींना हे मिळणार२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील आणि एका कुटुंबास २ हजार रुपये किमतीचे मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, चहापत्ती असा किराणा देण्यात येईल.यांना मिळणार अनुदान: मनरेगावरील ४ लाख आदिवासी मजूर, आदिम जमातीची २ लाख २६ हजार कुटुंब, पारधी जमातीची ६४ हजार कुटुंब, घटस्फोटित, परितक्त्या, विधवा, भूमिहिन भगिनींचे ३ लाख कुटुंब तसेच वैयक्तिक वनहक्क मिळालेले १ लाख ६५ हजार कुटुंब यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.