शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

राज्यात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 4, 2016 04:28 IST

मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.शहरात १ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यानिमित्त बुधवारी अमरप्रीत चौकात रावते यांच्या हस्ते हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गटनेता राजू वैद्य आदी उपस्थित होते. जीवितहानी कमी होण्यास हेल्मेटमुळे मदत होते. औरंगाबादमध्ये जनतेने त्याची सुरुवात केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये हेल्मेटचा प्रयोग ९५ टक्के यशस्वी झाला आहे. यानंतर औरंगाबादमध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. औरंगाबादमध्ये हे करणे अपरिहार्य आणि आवश्यक होते, असे रावते म्हणाले. हेल्मेट सक्तीमुळे शहरात हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याविषयी रावते म्हणाले, वाहन खरेदी करतानाच हेल्मेट मिळाले पाहिजे. वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनीच हेल्मेटची व्यवस्था करावी, हे नियमात आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे.हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वागत करीत असताना एका महिलेने गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पुष्पगुच्छ देऊन काहीही फायदा नाही, आधी रस्ते खड्डेमुक्त करा, शहर बससेवा सक्षम करा आणि नंतर हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी महिलेने केली. त्यावर रावते यांनी अमरप्रीत चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या शहर बसकडे लक्ष वेधले. ‘ती पाहा, बस रिकामी जात आहे, लोक बसतच नाहीत’, असे रावते म्हणाले; परंतु त्यानंतरही महिलेने आपले म्हणणे लावून धरले.पुण्यात हेल्मेटकारवाई होणार तीव्र औरंगाबादपाठोपाठ पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्यानंतर, हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी तीव्र्र करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. सध्या दिवसाला साधारणपणे साडेआठशे दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात येत आहे. थेट परिवहनमंत्र्यांनीच हेल्मेट सक्ती जाहीर केल्यामुळे, वाहतूक पोलिसांना बळच मिळाले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे त्याला सक्ती म्हणता येणार नाही. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे हा कायदा आहे, तो सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘सक्ती’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे आवाड यांनी सांगितले. वर्षाला साधारण ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये २४० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर २०१४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये २३९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यातीलही केवळ एकाच वाहनचालकाने हेल्मेट घातलेले होते. तरीही पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा नियम आंदोलनांद्वारे हाणून पाडला आहे.