शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 4, 2016 04:28 IST

मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.शहरात १ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यानिमित्त बुधवारी अमरप्रीत चौकात रावते यांच्या हस्ते हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गटनेता राजू वैद्य आदी उपस्थित होते. जीवितहानी कमी होण्यास हेल्मेटमुळे मदत होते. औरंगाबादमध्ये जनतेने त्याची सुरुवात केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये हेल्मेटचा प्रयोग ९५ टक्के यशस्वी झाला आहे. यानंतर औरंगाबादमध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. औरंगाबादमध्ये हे करणे अपरिहार्य आणि आवश्यक होते, असे रावते म्हणाले. हेल्मेट सक्तीमुळे शहरात हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याविषयी रावते म्हणाले, वाहन खरेदी करतानाच हेल्मेट मिळाले पाहिजे. वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनीच हेल्मेटची व्यवस्था करावी, हे नियमात आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे.हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वागत करीत असताना एका महिलेने गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पुष्पगुच्छ देऊन काहीही फायदा नाही, आधी रस्ते खड्डेमुक्त करा, शहर बससेवा सक्षम करा आणि नंतर हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी महिलेने केली. त्यावर रावते यांनी अमरप्रीत चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या शहर बसकडे लक्ष वेधले. ‘ती पाहा, बस रिकामी जात आहे, लोक बसतच नाहीत’, असे रावते म्हणाले; परंतु त्यानंतरही महिलेने आपले म्हणणे लावून धरले.पुण्यात हेल्मेटकारवाई होणार तीव्र औरंगाबादपाठोपाठ पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्यानंतर, हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी तीव्र्र करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. सध्या दिवसाला साधारणपणे साडेआठशे दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात येत आहे. थेट परिवहनमंत्र्यांनीच हेल्मेट सक्ती जाहीर केल्यामुळे, वाहतूक पोलिसांना बळच मिळाले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे त्याला सक्ती म्हणता येणार नाही. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे हा कायदा आहे, तो सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘सक्ती’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे आवाड यांनी सांगितले. वर्षाला साधारण ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये २४० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर २०१४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये २३९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यातीलही केवळ एकाच वाहनचालकाने हेल्मेट घातलेले होते. तरीही पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा नियम आंदोलनांद्वारे हाणून पाडला आहे.