शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

राज्यात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 4, 2016 04:28 IST

मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.शहरात १ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यानिमित्त बुधवारी अमरप्रीत चौकात रावते यांच्या हस्ते हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गटनेता राजू वैद्य आदी उपस्थित होते. जीवितहानी कमी होण्यास हेल्मेटमुळे मदत होते. औरंगाबादमध्ये जनतेने त्याची सुरुवात केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये हेल्मेटचा प्रयोग ९५ टक्के यशस्वी झाला आहे. यानंतर औरंगाबादमध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. औरंगाबादमध्ये हे करणे अपरिहार्य आणि आवश्यक होते, असे रावते म्हणाले. हेल्मेट सक्तीमुळे शहरात हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याविषयी रावते म्हणाले, वाहन खरेदी करतानाच हेल्मेट मिळाले पाहिजे. वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनीच हेल्मेटची व्यवस्था करावी, हे नियमात आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे.हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वागत करीत असताना एका महिलेने गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पुष्पगुच्छ देऊन काहीही फायदा नाही, आधी रस्ते खड्डेमुक्त करा, शहर बससेवा सक्षम करा आणि नंतर हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी महिलेने केली. त्यावर रावते यांनी अमरप्रीत चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या शहर बसकडे लक्ष वेधले. ‘ती पाहा, बस रिकामी जात आहे, लोक बसतच नाहीत’, असे रावते म्हणाले; परंतु त्यानंतरही महिलेने आपले म्हणणे लावून धरले.पुण्यात हेल्मेटकारवाई होणार तीव्र औरंगाबादपाठोपाठ पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्यानंतर, हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी तीव्र्र करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. सध्या दिवसाला साधारणपणे साडेआठशे दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात येत आहे. थेट परिवहनमंत्र्यांनीच हेल्मेट सक्ती जाहीर केल्यामुळे, वाहतूक पोलिसांना बळच मिळाले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे त्याला सक्ती म्हणता येणार नाही. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे हा कायदा आहे, तो सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘सक्ती’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे आवाड यांनी सांगितले. वर्षाला साधारण ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये २४० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर २०१४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये २३९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यातीलही केवळ एकाच वाहनचालकाने हेल्मेट घातलेले होते. तरीही पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा नियम आंदोलनांद्वारे हाणून पाडला आहे.