शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

राज्यात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 4, 2016 04:28 IST

मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.शहरात १ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यानिमित्त बुधवारी अमरप्रीत चौकात रावते यांच्या हस्ते हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गटनेता राजू वैद्य आदी उपस्थित होते. जीवितहानी कमी होण्यास हेल्मेटमुळे मदत होते. औरंगाबादमध्ये जनतेने त्याची सुरुवात केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये हेल्मेटचा प्रयोग ९५ टक्के यशस्वी झाला आहे. यानंतर औरंगाबादमध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. औरंगाबादमध्ये हे करणे अपरिहार्य आणि आवश्यक होते, असे रावते म्हणाले. हेल्मेट सक्तीमुळे शहरात हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याविषयी रावते म्हणाले, वाहन खरेदी करतानाच हेल्मेट मिळाले पाहिजे. वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनीच हेल्मेटची व्यवस्था करावी, हे नियमात आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे.हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वागत करीत असताना एका महिलेने गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पुष्पगुच्छ देऊन काहीही फायदा नाही, आधी रस्ते खड्डेमुक्त करा, शहर बससेवा सक्षम करा आणि नंतर हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी महिलेने केली. त्यावर रावते यांनी अमरप्रीत चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या शहर बसकडे लक्ष वेधले. ‘ती पाहा, बस रिकामी जात आहे, लोक बसतच नाहीत’, असे रावते म्हणाले; परंतु त्यानंतरही महिलेने आपले म्हणणे लावून धरले.पुण्यात हेल्मेटकारवाई होणार तीव्र औरंगाबादपाठोपाठ पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्यानंतर, हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी तीव्र्र करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. सध्या दिवसाला साधारणपणे साडेआठशे दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात येत आहे. थेट परिवहनमंत्र्यांनीच हेल्मेट सक्ती जाहीर केल्यामुळे, वाहतूक पोलिसांना बळच मिळाले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे त्याला सक्ती म्हणता येणार नाही. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे हा कायदा आहे, तो सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘सक्ती’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे आवाड यांनी सांगितले. वर्षाला साधारण ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये २४० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर २०१४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये २३९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यातीलही केवळ एकाच वाहनचालकाने हेल्मेट घातलेले होते. तरीही पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा नियम आंदोलनांद्वारे हाणून पाडला आहे.