शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुसळधार पाऊस, तरी टंचाईचे ढग

By admin | Updated: July 16, 2014 03:36 IST

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़ ही वाढ नगण्य असून, पाण्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे़ त्यामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. पर्यायी जलस्रोत निर्माण करण्याचे पालिकेचे प्रयत्नही सपशेल फेल गेल्याने पाणीकपात २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे़ मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १३ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे़ मात्र अद्याप तलावांमध्ये ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़ गतवर्षी जुलैच्या पंधरवड्यात तलावांमध्ये आठ लाख दशलक्ष लीटर साठा जमा झाला होता़ पावसाने अद्याप तलाव क्षेत्रात जोरही धरलेला नाही़ त्यामुळे मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे़२ जुलै रोजी पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती़ तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास ही कपात मागे घेण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले होते़ परंतु, आजच्या घडीला ३१ जुलैपर्यंतचा पाणीसाठा तलावांमध्ये असल्यामुळे आणखी १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़ याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे़ मालाड पूर्व येथील पठाणवाडी भागात गेले काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ याबाबत पी उत्तर विभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती़ परंतु अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले़ तर गेले आठवडाभर या ठिकाणी पाणीच बंद झाले़ यामुळे त्रस्त रहिवाशांनी याविरोधात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला दणका दिला़ सकाळी वर्दळीच्या वेळीच रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. (प्रतिनिधी)