शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

विदर्भात उष्णतेची लाट; मुंबईचा पारा जाणार ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 06:05 IST

हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने तापत असतानाच आता मुंबईच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा यात भर घालत आहे. हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवेळी पावसामुळे येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा हवामान कोरडे झाल्याने कमाल तापमानाने कहर केला आहे. विशेषत: मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत असतानाच राज्यात अधिकाधिक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते.दरम्यान, मुंबईत बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.राज्याचा अंदाज२४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२५ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२६ ते २७ एप्रिल : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.मंगळवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४३.४, अमरावती ४२.६, औरंगाबाद ४०.२, बीड ४२.१, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, जळगाव ४२.२, जेऊर ४०, मालेगाव ४२.८, मुंबई ३४.८, नागपूर ४२.५, नाशिक ४०.१, उस्मानाबाद ४०.९, परभणी ४३.२, पुणे ४०.३, सातारा ४०.१, सोलापूर ४१.३, ठाणे ४१.२, वर्धा ४३.८, यवतमाळ ४२.२.