शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

विदर्भात उष्णतेची लाट; मुंबईचा पारा जाणार ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 06:05 IST

हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने तापत असतानाच आता मुंबईच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा यात भर घालत आहे. हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवेळी पावसामुळे येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा हवामान कोरडे झाल्याने कमाल तापमानाने कहर केला आहे. विशेषत: मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत असतानाच राज्यात अधिकाधिक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते.दरम्यान, मुंबईत बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.राज्याचा अंदाज२४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२५ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२६ ते २७ एप्रिल : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.मंगळवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४३.४, अमरावती ४२.६, औरंगाबाद ४०.२, बीड ४२.१, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, जळगाव ४२.२, जेऊर ४०, मालेगाव ४२.८, मुंबई ३४.८, नागपूर ४२.५, नाशिक ४०.१, उस्मानाबाद ४०.९, परभणी ४३.२, पुणे ४०.३, सातारा ४०.१, सोलापूर ४१.३, ठाणे ४१.२, वर्धा ४३.८, यवतमाळ ४२.२.