शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

By अमेय गोगटे | Updated: November 15, 2021 12:24 IST

Shivshahir Babasaheb Purandare: महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आज ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील.

वर्ष २००७. रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरचं पुस्तक. एका शिक्षकानं 'पॅशन' म्हणून वेळात वेळ काढून, पदरचे पैसे खर्च करून लिहिलेलं. प्रकाशझोतात न आलेले काही किल्ले, त्यांचा इतिहास शोधण्यासाठी लेखकाने बरीच खटपट केली होती. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकाशनाला आले होते आणि त्यांच्यासोबत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. मी कार्यक्रम कव्हर करायला गेलो होतो. दोघंही उत्तम वक्ते असल्यानं, पुस्तक प्रकाशनाच्या 'जनरल' बातमीपेक्षा वेगळी काहीतरी मस्त बातमी मिळेल, अशी खात्री होती. पण, पुढे जे घडलं, तो माणूस म्हणून समृद्ध करणारा सोहळाच ठरला. 

प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. लेखकाने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्या हातावर ठेवला. सभागृह स्तब्ध झालं होतं आणि शिक्षक-लेखकही भारावला होता - शहारला होता. या पुस्तकासाठी झालेल्या खर्चाचा भार शिक्षकावर पडू नये, ही शिवशाहिरांची भावना होती. सगळंच शब्दांच्या पलीकडचं होतं. अनेकांचे डोळे पाणावले होते. 

त्यानंतर, राज ठाकरे यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा गोफ अनमोल आहे. तो त्यांना परत करा आणि पुस्तकाचा जो काही खर्च झालाय तेवढ्या रकमेचा चेक माझ्या घरी येऊन घेऊन जा'', असा 'आदेशच' त्यांनी लेखकाला दिला आणि पुन्हा एकदा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

आज महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील. शिवचरित्र जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः अथक मेहनत केलीच, पण शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिलेदारांना शक्य तेवढी सगळी मदतही केली. त्यांच्या मनाचा मोठेपणा, औदार्य पाहता आलं, हे भाग्यच! 

त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव खरोखरच आठवत नाहीए. गुगलवर बरंच शोधलं, पण २००७ मध्ये आजच्यासारखा डिजिटल मीडिया नव्हता आणि स्मार्टफोनही. तेव्हा 'झी २४ तास' ही एकमेव मराठी वृत्तवाहिनी होती आणि त्यावर या व्हिडीओचं पॅकेज केलं होतं. पण, ते यू-ट्युबवर वगैरे अपलोड झालेलं नसल्यानं पुरावा म्हणून काही देता येत नाही. नंतर काय झालं, तो लेखक राज ठाकरेंना भेटला का, हेही माहीत नाही. पण, काही प्रसंग आपल्या मनावर कायमचे कोरले जातात, त्यापैकी हा एक आहे. शिवशाहिरांना मानाचा मुजरा!

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेRaj Thackerayराज ठाकरे