शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

‘दिल से’ एक्स्प्रेसला समर्थकांच्या शंकेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

शेट्टी-सदाभाऊंमध्ये बेबनावची चर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समीकरण बदलतंय

अशोक पाटील --इस्लामपूर--राज्यातील ऊस, कांदा आणि कापूस उत्पादकांच्या ताकदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीपुढे वटकण लावून बसले आहेत. त्याचा फैसला अद्याप झाला नसला तरी, शेट्टी व खोत यांच्याजवळील कार्यकर्त्यांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटातच उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी साखरसम्राटांचा केंद्रबिंदू असलेल्या वाळवा, शिराळ्यात संघर्षाची भाषा सुरू केली आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या पाठीशी जुन्या व ठराविक कार्यकर्त्यांचाच वावर असल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने राम पाटील, अनिल पाटील (शिराळा), आप्पा पाटील (इस्लामपूर), शहाजी पाटील (ताकारी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे (बहे), मधुकर डिसले (किल्ले मच्छिंद्रगड), गुंडाभाऊ आवटी (तांबवे), अशोक सलगर (खरातवाडी), अ‍ॅड. युनूस संदे (पेठ) आदीसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सदाभाऊ यांना राज्यात लाल दिव्याची गाडी मिळणार, या स्वार्थापोटी काही नवीन कार्यकर्ते खोत यांच्याभोवती वावरताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याभोवती काही ठराविक कार्यकर्त्यांचाच लवाजमा दिसत आहे. सचिन पवार (रेठरे हरणाक्ष), भास्कर कदम (मसुचीवाडी), भागवत जाधव (नवेखेड) यांचा समावेश असून, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मात्र दोन्ही नेत्यांना समान अंतरावर ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांत शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे पानिपत करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी निश्चय केला होता. परंतु हा हेतू सफल न होता, संघटनेतीलच बी. जे. पाटील यांनी स्वाभिमानी पक्ष सोडून मोठा हादरा दिला. तसेच कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील हेही या संघटनेत सामील झाले होते. परंतु त्यांनी अपक्ष अर्ज भरून एकास एक उमेदवारीचा फज्जा उडविला. त्यामुळे जयंत पाटील एकाकी निवडून आले. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या सर्वच कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी सावरले नाही, तर स्वाभिमानी संघटनेला उतरती कळा लागेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वाभिमानी संघटना सध्या सरकारबरोबर आहे. राजू शेट्टी आणि खोत यांनी शासनदरबारी बसून ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारवर दबाव आणला पाहिजे. जयंत पाटील यांना ऊस उत्पादकांबद्दल प्रेम नाही, तर त्यांच्या कारखान्याच्या को-जनरेशनचे काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एफआरपी एकरकमी देण्यासाठी दोन महिने साखर कारखाने बंद ठेवण्याची भाषा केली आहे. हा फक्त बनाव आहे. - अभिजित पाटील, माजी जि. प. सदस्य