शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

‘दिल से’ एक्स्प्रेसला समर्थकांच्या शंकेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

शेट्टी-सदाभाऊंमध्ये बेबनावची चर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समीकरण बदलतंय

अशोक पाटील --इस्लामपूर--राज्यातील ऊस, कांदा आणि कापूस उत्पादकांच्या ताकदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीपुढे वटकण लावून बसले आहेत. त्याचा फैसला अद्याप झाला नसला तरी, शेट्टी व खोत यांच्याजवळील कार्यकर्त्यांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटातच उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी साखरसम्राटांचा केंद्रबिंदू असलेल्या वाळवा, शिराळ्यात संघर्षाची भाषा सुरू केली आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या पाठीशी जुन्या व ठराविक कार्यकर्त्यांचाच वावर असल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने राम पाटील, अनिल पाटील (शिराळा), आप्पा पाटील (इस्लामपूर), शहाजी पाटील (ताकारी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे (बहे), मधुकर डिसले (किल्ले मच्छिंद्रगड), गुंडाभाऊ आवटी (तांबवे), अशोक सलगर (खरातवाडी), अ‍ॅड. युनूस संदे (पेठ) आदीसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सदाभाऊ यांना राज्यात लाल दिव्याची गाडी मिळणार, या स्वार्थापोटी काही नवीन कार्यकर्ते खोत यांच्याभोवती वावरताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याभोवती काही ठराविक कार्यकर्त्यांचाच लवाजमा दिसत आहे. सचिन पवार (रेठरे हरणाक्ष), भास्कर कदम (मसुचीवाडी), भागवत जाधव (नवेखेड) यांचा समावेश असून, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मात्र दोन्ही नेत्यांना समान अंतरावर ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांत शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे पानिपत करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी निश्चय केला होता. परंतु हा हेतू सफल न होता, संघटनेतीलच बी. जे. पाटील यांनी स्वाभिमानी पक्ष सोडून मोठा हादरा दिला. तसेच कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील हेही या संघटनेत सामील झाले होते. परंतु त्यांनी अपक्ष अर्ज भरून एकास एक उमेदवारीचा फज्जा उडविला. त्यामुळे जयंत पाटील एकाकी निवडून आले. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या सर्वच कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी सावरले नाही, तर स्वाभिमानी संघटनेला उतरती कळा लागेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वाभिमानी संघटना सध्या सरकारबरोबर आहे. राजू शेट्टी आणि खोत यांनी शासनदरबारी बसून ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारवर दबाव आणला पाहिजे. जयंत पाटील यांना ऊस उत्पादकांबद्दल प्रेम नाही, तर त्यांच्या कारखान्याच्या को-जनरेशनचे काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एफआरपी एकरकमी देण्यासाठी दोन महिने साखर कारखाने बंद ठेवण्याची भाषा केली आहे. हा फक्त बनाव आहे. - अभिजित पाटील, माजी जि. प. सदस्य