शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘दिल से’ एक्स्प्रेसला समर्थकांच्या शंकेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

शेट्टी-सदाभाऊंमध्ये बेबनावची चर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समीकरण बदलतंय

अशोक पाटील --इस्लामपूर--राज्यातील ऊस, कांदा आणि कापूस उत्पादकांच्या ताकदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीपुढे वटकण लावून बसले आहेत. त्याचा फैसला अद्याप झाला नसला तरी, शेट्टी व खोत यांच्याजवळील कार्यकर्त्यांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटातच उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी साखरसम्राटांचा केंद्रबिंदू असलेल्या वाळवा, शिराळ्यात संघर्षाची भाषा सुरू केली आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या पाठीशी जुन्या व ठराविक कार्यकर्त्यांचाच वावर असल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने राम पाटील, अनिल पाटील (शिराळा), आप्पा पाटील (इस्लामपूर), शहाजी पाटील (ताकारी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे (बहे), मधुकर डिसले (किल्ले मच्छिंद्रगड), गुंडाभाऊ आवटी (तांबवे), अशोक सलगर (खरातवाडी), अ‍ॅड. युनूस संदे (पेठ) आदीसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सदाभाऊ यांना राज्यात लाल दिव्याची गाडी मिळणार, या स्वार्थापोटी काही नवीन कार्यकर्ते खोत यांच्याभोवती वावरताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याभोवती काही ठराविक कार्यकर्त्यांचाच लवाजमा दिसत आहे. सचिन पवार (रेठरे हरणाक्ष), भास्कर कदम (मसुचीवाडी), भागवत जाधव (नवेखेड) यांचा समावेश असून, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मात्र दोन्ही नेत्यांना समान अंतरावर ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांत शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे पानिपत करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी निश्चय केला होता. परंतु हा हेतू सफल न होता, संघटनेतीलच बी. जे. पाटील यांनी स्वाभिमानी पक्ष सोडून मोठा हादरा दिला. तसेच कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील हेही या संघटनेत सामील झाले होते. परंतु त्यांनी अपक्ष अर्ज भरून एकास एक उमेदवारीचा फज्जा उडविला. त्यामुळे जयंत पाटील एकाकी निवडून आले. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या सर्वच कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी सावरले नाही, तर स्वाभिमानी संघटनेला उतरती कळा लागेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वाभिमानी संघटना सध्या सरकारबरोबर आहे. राजू शेट्टी आणि खोत यांनी शासनदरबारी बसून ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारवर दबाव आणला पाहिजे. जयंत पाटील यांना ऊस उत्पादकांबद्दल प्रेम नाही, तर त्यांच्या कारखान्याच्या को-जनरेशनचे काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एफआरपी एकरकमी देण्यासाठी दोन महिने साखर कारखाने बंद ठेवण्याची भाषा केली आहे. हा फक्त बनाव आहे. - अभिजित पाटील, माजी जि. प. सदस्य