शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारची कानउघाडणी, क्रीडा संकुल स्थलांतराचा निर्णय केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:43 IST

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले., खेळालाही महत्त्व द्या : हायकाेर्ट

मुंबई -  राष्ट्र आणि लोकांच्या विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरकारने ‘काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण मंत्रा’प्रमाणेच खेळालाही महत्त्व द्यावे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. पुरोगामी राज्य समाजाच्या अशा गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने नमूद केले. 

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले. तसेच या संकुलासाठी ११५ कि.मी.वर असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जागा ठेवण्यात आली. सोमवारी न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द केला. २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी जागा देण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये नियोजन प्राधिकरणाने जागेचा काही भाग खासगी विकासकाला व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी दिला. वर्तमानातीलच नव्हे तर नागरिकांच्या भविष्यकालीन हक्कासाठी खुल्या जागा, क्रीडांगणे, क्रीडा संकुले राखून ठेवण्याबाबत प्राधिकरणाने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारचा संबंधित निर्णय जमिनीच्या व्यावसायिक वापराला चालना देणारा होता. जमिनीच्या विकासाची भूक ज्या विकासकांना आहे, ज्यांना शहराचे रूपांतर ‘काँक्रिटच्या जंगला’त करायचे आहे, अशांसाठी हा निर्णय होता, असे न्यायालयाने म्हटले.  मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सार्वजनिक भूखंडांवरील वाढते काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण विचारात घेता, त्याला आळा घालणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का?पायाभूत सुविधा आणि मनोरंजन पार्क, गार्डन, क्रीडा संकुल यांसारख्या भविष्यात अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांना डावलून अशा प्रकारचे काँक्रिटीकरण कितपत वाढविता येईल, याचा विचार सरकार आणि नियोजन प्राधिकरणांनी करावा. सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का? महसुलाच्या उद्देशाने सरकारी प्राधिकरणे सरकारी जमिनींचे आणखी किती शोषण करणार? असा सवालही न्यायालयाने केला.

... तर ते सरकारचे अपयशजाणूनबुजून शहरी जंगले निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर ते सरकारचे फार मोठे अपयश असेल. नागरिकांच्या भविष्यातील हक्कांबाबत दूरदृष्टी, काळजी नसल्यास आपण एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास मान्यता देणाऱ्या घटनात्मक तत्त्वांना तिलांजली देत आहोत, असा त्याचा अर्थ होतो.  २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी आरक्षित ठेवलेली जागा १८ वर्षे वापरली नाही, हे अकल्पनीय आहे, असे आश्चर्य खंडपीठाने व्यक्त केले.

न्यायालयाचे निरीक्षण...खेळांना आलेल्या महत्त्वाबाबत सरकार आणि अन्य प्राधिकरणांचा दृष्टिकोन योग्य नाही. प्रगतीशील राज्य समाजाच्या या गरजांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. मुलांना आणि युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय