शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

राज्य सरकारची कानउघाडणी, क्रीडा संकुल स्थलांतराचा निर्णय केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:43 IST

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले., खेळालाही महत्त्व द्या : हायकाेर्ट

मुंबई -  राष्ट्र आणि लोकांच्या विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरकारने ‘काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण मंत्रा’प्रमाणेच खेळालाही महत्त्व द्यावे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. पुरोगामी राज्य समाजाच्या अशा गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने नमूद केले. 

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले. तसेच या संकुलासाठी ११५ कि.मी.वर असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जागा ठेवण्यात आली. सोमवारी न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द केला. २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी जागा देण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये नियोजन प्राधिकरणाने जागेचा काही भाग खासगी विकासकाला व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी दिला. वर्तमानातीलच नव्हे तर नागरिकांच्या भविष्यकालीन हक्कासाठी खुल्या जागा, क्रीडांगणे, क्रीडा संकुले राखून ठेवण्याबाबत प्राधिकरणाने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारचा संबंधित निर्णय जमिनीच्या व्यावसायिक वापराला चालना देणारा होता. जमिनीच्या विकासाची भूक ज्या विकासकांना आहे, ज्यांना शहराचे रूपांतर ‘काँक्रिटच्या जंगला’त करायचे आहे, अशांसाठी हा निर्णय होता, असे न्यायालयाने म्हटले.  मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सार्वजनिक भूखंडांवरील वाढते काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण विचारात घेता, त्याला आळा घालणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का?पायाभूत सुविधा आणि मनोरंजन पार्क, गार्डन, क्रीडा संकुल यांसारख्या भविष्यात अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांना डावलून अशा प्रकारचे काँक्रिटीकरण कितपत वाढविता येईल, याचा विचार सरकार आणि नियोजन प्राधिकरणांनी करावा. सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का? महसुलाच्या उद्देशाने सरकारी प्राधिकरणे सरकारी जमिनींचे आणखी किती शोषण करणार? असा सवालही न्यायालयाने केला.

... तर ते सरकारचे अपयशजाणूनबुजून शहरी जंगले निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर ते सरकारचे फार मोठे अपयश असेल. नागरिकांच्या भविष्यातील हक्कांबाबत दूरदृष्टी, काळजी नसल्यास आपण एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास मान्यता देणाऱ्या घटनात्मक तत्त्वांना तिलांजली देत आहोत, असा त्याचा अर्थ होतो.  २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी आरक्षित ठेवलेली जागा १८ वर्षे वापरली नाही, हे अकल्पनीय आहे, असे आश्चर्य खंडपीठाने व्यक्त केले.

न्यायालयाचे निरीक्षण...खेळांना आलेल्या महत्त्वाबाबत सरकार आणि अन्य प्राधिकरणांचा दृष्टिकोन योग्य नाही. प्रगतीशील राज्य समाजाच्या या गरजांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. मुलांना आणि युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय