शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

राज्य सरकारची कानउघाडणी, क्रीडा संकुल स्थलांतराचा निर्णय केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:43 IST

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले., खेळालाही महत्त्व द्या : हायकाेर्ट

मुंबई -  राष्ट्र आणि लोकांच्या विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरकारने ‘काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण मंत्रा’प्रमाणेच खेळालाही महत्त्व द्यावे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. पुरोगामी राज्य समाजाच्या अशा गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने नमूद केले. 

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले. तसेच या संकुलासाठी ११५ कि.मी.वर असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जागा ठेवण्यात आली. सोमवारी न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द केला. २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी जागा देण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये नियोजन प्राधिकरणाने जागेचा काही भाग खासगी विकासकाला व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी दिला. वर्तमानातीलच नव्हे तर नागरिकांच्या भविष्यकालीन हक्कासाठी खुल्या जागा, क्रीडांगणे, क्रीडा संकुले राखून ठेवण्याबाबत प्राधिकरणाने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारचा संबंधित निर्णय जमिनीच्या व्यावसायिक वापराला चालना देणारा होता. जमिनीच्या विकासाची भूक ज्या विकासकांना आहे, ज्यांना शहराचे रूपांतर ‘काँक्रिटच्या जंगला’त करायचे आहे, अशांसाठी हा निर्णय होता, असे न्यायालयाने म्हटले.  मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सार्वजनिक भूखंडांवरील वाढते काँक्रिटीकरण आणि व्यावसायिकरण विचारात घेता, त्याला आळा घालणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का?पायाभूत सुविधा आणि मनोरंजन पार्क, गार्डन, क्रीडा संकुल यांसारख्या भविष्यात अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांना डावलून अशा प्रकारचे काँक्रिटीकरण कितपत वाढविता येईल, याचा विचार सरकार आणि नियोजन प्राधिकरणांनी करावा. सध्याचे काँक्रिटीकरण पुरेसे नाही का? महसुलाच्या उद्देशाने सरकारी प्राधिकरणे सरकारी जमिनींचे आणखी किती शोषण करणार? असा सवालही न्यायालयाने केला.

... तर ते सरकारचे अपयशजाणूनबुजून शहरी जंगले निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर ते सरकारचे फार मोठे अपयश असेल. नागरिकांच्या भविष्यातील हक्कांबाबत दूरदृष्टी, काळजी नसल्यास आपण एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास मान्यता देणाऱ्या घटनात्मक तत्त्वांना तिलांजली देत आहोत, असा त्याचा अर्थ होतो.  २००३ मध्ये क्रीडा संकुलासाठी आरक्षित ठेवलेली जागा १८ वर्षे वापरली नाही, हे अकल्पनीय आहे, असे आश्चर्य खंडपीठाने व्यक्त केले.

न्यायालयाचे निरीक्षण...खेळांना आलेल्या महत्त्वाबाबत सरकार आणि अन्य प्राधिकरणांचा दृष्टिकोन योग्य नाही. प्रगतीशील राज्य समाजाच्या या गरजांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. मुलांना आणि युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय