शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहीहंडीत यंदा बिनधास्त 9 थर लावा, वयोमर्यादेची अटही 18 वरुन 14 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:08 IST

दहीहंडी उत्सवातील थरांची उंची तसेच लहान मुलांच्या सहभागाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महत्वपूर्ण निकाल दिला.

मुंबई, दि. 7 - दहीहंडी उत्सवातील थरांची उंची तसेच लहान मुलांच्या सहभागाबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. दहीहंडी पथकात यापुढे 14 वर्षाखालील मुलांना सहभागी होता येणार नाही तसेच थरांच्या उंचीसंबंधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच वयोमर्यादेची अटही 18 वरुन 14 करण्यात आली आहे. थरांची उंची किती असावी हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. तो राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रातला विषय आहे. 

विधिमंडळाने थरांसंबंधी निर्णय घेऊन आवश्यक ते निर्देश द्यावेत. आम्ही काही आदेश देणे हा विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप ठरेल असे उच्च न्यायालयाने सांगितले. राज्य सरकारने कायदा करुन 2015 साली दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात केला होता. दहीहंडी खेळताना दुर्घटना घडल्यास पीडितांना नुकसान भरपाईपोटी तात्काळ 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दहीहंडी समन्वय समितीला देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला याप्रकरणी  सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. दहीहंडी पथकात 14 वर्षाखालील मुले नसतील असे आश्वासन सरकारने कोर्टाला दिले आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपायोजना करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. मागच्यावर्षी न्यायालयाने 18 वर्षाखालील मुलांना दहीहंडी पथकात सहभागी होण्यावर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे सर्वच दहीहंडी पथकांचे लक्ष लागले होते. महिन्याभरापासून सराव करणा-या दहीहंडी पथकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.  दरवर्षी हंडीबरोबर थरांची उंची वाढत चालल्याने गोविंदांच्या अपघाताची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती.

मागच्यावर्षी सुद्धा न्यायालयाने हंडीच्या उंचीवर मर्यादा आणणारे काही निर्णय दिले होते. पण आता आधीचे निर्णय विचारात न घेता नव्याने सुनावणी झाली. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आशिष शेलारही हायकोर्टात उपस्थित होते. दहीहंडीचे थर हा संस्कृतीचा भाग असून,  चीन आणि  स्पेनमध्येही मानवी मनोरे रचले जातात असा युक्तीवाद राज्य सरकारच्यवतीने कोर्टात करण्यात आला.  जयजवान, माझगाव ताडवाडी या गोविंदा पथकांमध्ये आठ ते नऊ थर रचण्याची क्षमता आहे. मागच्या काही वर्षांपासून या पथकांनी लीलया थर रचून विक्रम केला आहे.