शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

Coronavirus: महाराष्ट्र लवकरच मास्कमुक्त होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:07 IST

Coronavirus: देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.

कोल्हापूर: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Coronavirus) संकट देशभरात घोंगावत आहे. कोरोनामुळे अन्य गोष्टींप्रमाणे मास्क अनिवार्य झाले आहे. मास्कमुळे अनेकांना अनेकविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांमध्ये मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार, अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यावर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

यूके, जर्मन, फ्रान्स आदी पाश्चिमात्य देशांनी मास्कमुक्ती केली असून, त्यामागील तंत्र काय आहे. त्याची माहिती संकलित केली जाईल. केंद्र, राज्यातील टास्कफोर्सचा याबाबत सल्ला घेण्यात येईल. कोरोना, ओमायक्रॉनची रुग्णसंख्या कमी होत असल्याने चित्रपटगृहे, रेस्टॉरंट आदींबाबत सध्या असणारे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केले जातील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. 

आम्ही आमच्यापरिने जमेल तेवढे काम केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना कोरोनाचा प्रसारासाठी महाराष्ट्रासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली. कोरोना पेशंटला प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थानी राज्याचे कौतुक केले. आम्ही आमच्यापरिने जमेल तेवढे काम केले आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील अनेक रुग्णालयांनी पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लसींची खरेदी केली. आता मात्र लस एक्सपायरी होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी या लसी घ्याव्यात. त्यांची लस आधी घ्यावी आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात याबाबत केंद्राशी आणि राज्याशी चर्चा करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे