शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आरोग्यमंत्र्यांना धरले धारेवर!

By admin | Updated: June 8, 2017 03:17 IST

कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र यावेळी कुपोषण हे केवळ औषधोपचाराने दूर होणार नसून यासाठी दारिद्रय निर्मूलनाचा प्रश्न हाती घेणे आवश्यक असल्याचे मत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मांडून मंत्री महोदयांना वास्तव जाणवून दिले. जिल्ह्यातील रोहयो सक्षम नसणे, रिक्त पदे न भरणे, अंगणवाडी सेविका मानधन, पोषण आहार देयके थकित ठेवणे यासारखे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ आरोग्य सेवक आणि अत्यल्प मानधनावरील अंगणवाडी सेविका व आशा ताई यांच्यावर भार टाकून हे अभियान यशस्वी होणार नाही असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, आदिवासी विकास जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, सहाय्यक आरोग्य संचालक रावखंडे आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी होते. १९९२ पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांना कुपोषणाने घट्ट विळखा घातला असून दरवर्षी विविध योजना राबवून ते थांबविण्याचा अशस्वी प्रयत्न सुरू आहे. पावसाळ्यात येथील कुपोषित आदिवासीबांधवांची आकडेवारी वाढणार आहे. ‘चला पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करूया’ या घोषणेने सुरू केलेल्या कुपोषण मुक्त पालघर अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत आधीच उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते विजय जाधव यांनी मंत्री डॉ सावंत यांनी अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर त्यांच्यावर टाकलेल्या अधिक जबाबदाऱ्या या त्यांना दिल्या जाणाऱ्या तटपुंज्या मानधनात कशा पार पडणार? असा सवाल केला. जाधव यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशावर्कर यांच्या व्यथा आणि पोषक आहाराची थकीत बिलं याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. आता पर्यंत झालेल्या दौऱ्यांनी काय निष्पन्न झाले असाही सवाल त्यांनी केला. तसेच बैठक संपल्यानंतर आशा कार्यकर्र्त्यांंनी मंत्र्यांना निवेदन देऊन १०८ अ‍ॅम्ब्युलन्स लवकरच मिळावी, कारण ती नसल्याने आम्हाला पदरमोड करून रूग्णांना वाहनं उपलब्ध करुन द्यावे लागतात. त्याचे देयके सुध्दा आम्हाला लवकर मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यावेळी डॉ. सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने त्यांची देयके वितरीत करण्याचे आदेश दिले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, गणेश उंबरसडा, सिता घाटाळ, कैलास तुंबडा, मिलिंद थुळे, संतोष धिंडा, कमलाकर भोरे, जमशेद खान ,मनीष भानुशाली, निलेश वाघ, जाणू मोहंडकर व कार्यकर्ते उपस्थित होते. >रिक्त पदांचा प्रश्नश्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या अभावाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षात असतांना विधानसभेत डॉ. सावंत यांनी केलेली भाषणे आणि मागण्यांची आठवण करुन दिली. यावेळी डॉ. सावंत यांनी मी एकटाच असा मंत्री आहे की, ज्याने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या उणिवा दूर करण्याची मागणी केली होती. या रिक्त पदांचा तातडीने आढावा घऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले.