शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आरोग्यमंत्र्यांना धरले धारेवर!

By admin | Updated: June 8, 2017 03:17 IST

कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र यावेळी कुपोषण हे केवळ औषधोपचाराने दूर होणार नसून यासाठी दारिद्रय निर्मूलनाचा प्रश्न हाती घेणे आवश्यक असल्याचे मत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मांडून मंत्री महोदयांना वास्तव जाणवून दिले. जिल्ह्यातील रोहयो सक्षम नसणे, रिक्त पदे न भरणे, अंगणवाडी सेविका मानधन, पोषण आहार देयके थकित ठेवणे यासारखे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ आरोग्य सेवक आणि अत्यल्प मानधनावरील अंगणवाडी सेविका व आशा ताई यांच्यावर भार टाकून हे अभियान यशस्वी होणार नाही असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, आदिवासी विकास जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, सहाय्यक आरोग्य संचालक रावखंडे आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी होते. १९९२ पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांना कुपोषणाने घट्ट विळखा घातला असून दरवर्षी विविध योजना राबवून ते थांबविण्याचा अशस्वी प्रयत्न सुरू आहे. पावसाळ्यात येथील कुपोषित आदिवासीबांधवांची आकडेवारी वाढणार आहे. ‘चला पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करूया’ या घोषणेने सुरू केलेल्या कुपोषण मुक्त पालघर अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत आधीच उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते विजय जाधव यांनी मंत्री डॉ सावंत यांनी अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर त्यांच्यावर टाकलेल्या अधिक जबाबदाऱ्या या त्यांना दिल्या जाणाऱ्या तटपुंज्या मानधनात कशा पार पडणार? असा सवाल केला. जाधव यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशावर्कर यांच्या व्यथा आणि पोषक आहाराची थकीत बिलं याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. आता पर्यंत झालेल्या दौऱ्यांनी काय निष्पन्न झाले असाही सवाल त्यांनी केला. तसेच बैठक संपल्यानंतर आशा कार्यकर्र्त्यांंनी मंत्र्यांना निवेदन देऊन १०८ अ‍ॅम्ब्युलन्स लवकरच मिळावी, कारण ती नसल्याने आम्हाला पदरमोड करून रूग्णांना वाहनं उपलब्ध करुन द्यावे लागतात. त्याचे देयके सुध्दा आम्हाला लवकर मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यावेळी डॉ. सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने त्यांची देयके वितरीत करण्याचे आदेश दिले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, गणेश उंबरसडा, सिता घाटाळ, कैलास तुंबडा, मिलिंद थुळे, संतोष धिंडा, कमलाकर भोरे, जमशेद खान ,मनीष भानुशाली, निलेश वाघ, जाणू मोहंडकर व कार्यकर्ते उपस्थित होते. >रिक्त पदांचा प्रश्नश्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या अभावाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षात असतांना विधानसभेत डॉ. सावंत यांनी केलेली भाषणे आणि मागण्यांची आठवण करुन दिली. यावेळी डॉ. सावंत यांनी मी एकटाच असा मंत्री आहे की, ज्याने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या उणिवा दूर करण्याची मागणी केली होती. या रिक्त पदांचा तातडीने आढावा घऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले.