शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेला घरघर

By admin | Updated: June 5, 2017 02:56 IST

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे. आधीच रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचे ठोके वाढलेले असतानाच असुविधांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये सामान्यांना परवडणारी ठोस पर्यायी आरोग्य व्यवस्थाच नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे.रायगड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी, यासाठी कोणतेही लोक प्रतिनिधी कणखर पावले टाकताना दिसून येत नाही. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सुदृढ असावी, असे कोणालाच वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २६ लाखांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे महाड-१, महाड-२, रोहे, उसर, नागोठणे, विळेभागाड, तळोजा आणि पाताळगंगा असे सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार ७०२ सूक्ष्म उद्योग आहेत, तर ८९४ लहान, ३३ मध्यम आणि २५४ मोठे असे एकूण दोन हजार ८८३ प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा पसारा असताना मात्र येथील आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे.रायगड जिल्ह्यासाठी एक जिल्हा रु ग्णालय, पाच उपजिल्हा रु ग्णालये, आठ ग्रामीण रु ग्णालये आहेत. या रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. ६९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचा थेट परिणाम सामांन्याच्या आरोग्यावर होत आहे. त्यातच १८ वैद्यकीय अधिकारी हे अनधिकृत गैरहजर असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, रेडिआॅलॉजिस्ट यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे येथे शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत. एखाद्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रि येसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईची वाट धरावी लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांना मुंबईमध्ये जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची तेथे परवड होते. अधिकच्या उपचारासाठी जाताना रस्त्यातच प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णाचा मृत्यू प्रवासात होण्याचेही प्रकार घडले आहेत.लवकरच सुधारणा-डॉ. अजित गवळीजिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेले सिटी स्कॅन मशिन रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. आपल्याकडे आधीच मशिन आल्याने मंजूर झालेले मशिन त्यांना देण्यात आले आहे. तेथील नागरिकांनाही त्याची गरज आहे. आपल्याकडे सिटी स्कॅन करण्यासाठी रु ग्णांची गर्दी असते. सध्या रु ग्णांना खासगी सेवा घ्यावी लागत आहे. आपल्याकडील सिटी स्कॅन मशिन रुग्णांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पैशांसह वेळेचीही बचत होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित असुविधेबाबत लवकरच सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्यात हजर होण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश काढण्यात येतात. मात्र, बरेच अधिकारी हजर होऊन जिल्ह्यातून पळ काढीत आहेत. याची कारणे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाहीत. १८ वैद्यकीय अधिकारी परस्पर रजेवर गेले आहेत. याबाबत जिल्हा रु ग्णालय प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.रायगड जिल्हा सामान्य रु ग्णालयात वर्ग-एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदे आहेत. त्यापैकी ९ पदे भरली आहेत. मात्र, त्यामधील एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहे. वर्ग-दोनच्या १०० पदांपैकी ५९ पदे भरली आहेत. मात्र, त्यातील प्रत्यक्षात ४२ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. १७ वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहिले आहेत.