शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आरोग्य यंत्रणेला घरघर

By admin | Updated: June 5, 2017 02:56 IST

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे. आधीच रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचे ठोके वाढलेले असतानाच असुविधांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये सामान्यांना परवडणारी ठोस पर्यायी आरोग्य व्यवस्थाच नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे.रायगड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी, यासाठी कोणतेही लोक प्रतिनिधी कणखर पावले टाकताना दिसून येत नाही. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सुदृढ असावी, असे कोणालाच वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २६ लाखांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे महाड-१, महाड-२, रोहे, उसर, नागोठणे, विळेभागाड, तळोजा आणि पाताळगंगा असे सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार ७०२ सूक्ष्म उद्योग आहेत, तर ८९४ लहान, ३३ मध्यम आणि २५४ मोठे असे एकूण दोन हजार ८८३ प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा पसारा असताना मात्र येथील आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे.रायगड जिल्ह्यासाठी एक जिल्हा रु ग्णालय, पाच उपजिल्हा रु ग्णालये, आठ ग्रामीण रु ग्णालये आहेत. या रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. ६९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचा थेट परिणाम सामांन्याच्या आरोग्यावर होत आहे. त्यातच १८ वैद्यकीय अधिकारी हे अनधिकृत गैरहजर असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, रेडिआॅलॉजिस्ट यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे येथे शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत. एखाद्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रि येसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईची वाट धरावी लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांना मुंबईमध्ये जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची तेथे परवड होते. अधिकच्या उपचारासाठी जाताना रस्त्यातच प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णाचा मृत्यू प्रवासात होण्याचेही प्रकार घडले आहेत.लवकरच सुधारणा-डॉ. अजित गवळीजिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेले सिटी स्कॅन मशिन रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. आपल्याकडे आधीच मशिन आल्याने मंजूर झालेले मशिन त्यांना देण्यात आले आहे. तेथील नागरिकांनाही त्याची गरज आहे. आपल्याकडे सिटी स्कॅन करण्यासाठी रु ग्णांची गर्दी असते. सध्या रु ग्णांना खासगी सेवा घ्यावी लागत आहे. आपल्याकडील सिटी स्कॅन मशिन रुग्णांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पैशांसह वेळेचीही बचत होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित असुविधेबाबत लवकरच सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्यात हजर होण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश काढण्यात येतात. मात्र, बरेच अधिकारी हजर होऊन जिल्ह्यातून पळ काढीत आहेत. याची कारणे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाहीत. १८ वैद्यकीय अधिकारी परस्पर रजेवर गेले आहेत. याबाबत जिल्हा रु ग्णालय प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.रायगड जिल्हा सामान्य रु ग्णालयात वर्ग-एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदे आहेत. त्यापैकी ९ पदे भरली आहेत. मात्र, त्यामधील एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहे. वर्ग-दोनच्या १०० पदांपैकी ५९ पदे भरली आहेत. मात्र, त्यातील प्रत्यक्षात ४२ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. १७ वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहिले आहेत.