शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

जडीबुटीची विक्री करीत तो झाला पदवीधर

By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST

पंधरा जणांच्या पालातील कुटुंबात वास्तव्य करणारा, शिक्षणाचा घरात गंध नसताना गल्लीगल्लीतून आणि खेड्यापाड्यांतून

बाळासाहेब कुलकर्णी / सासवडपंधरा जणांच्या पालातील कुटुंबात वास्तव्य करणारा, शिक्षणाचा घरात गंध नसताना गल्लीगल्लीतून आणि खेड्यापाड्यांतून जडीबुटीची विक्री करीत फिरणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या समाजातील २२ वर्षीय युवकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:ला बदलण्याचा ध्यास घेतला आणि बघता-बघता हा तरुण वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. केवळ पदवीधरच नव्हे, तर आता चक्क एम.कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करतोय. ही गोष्ट आहे सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या चितोडी लोहार समाजातील एका युवकाची.रामूसिंग जनकसिंग चितोडिया असे या युवकाचे नाव आहे. चाळीसगाव हे त्याचे मूळ गाव असून, सुमारे २० कुटुंबे आणि ८० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ही मंडळी सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरात राहून परिसरात जडीबुटी विक्री करून गुजराण करीत आहेत.जवळच्याच नातेवाइकांची मदत घेत पुण्यात भोसरी येथील समता माध्यमिक विद्यालयात अनेक अडचणींवर मात करीत पहिली ते पाचवीपर्यंतचे त्याने शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक अडचणीमुळे परत शिक्षणात व्यत्यय आला; पण मुख्याध्यापक पडवळ सर व वर्गशिक्षक कदम सर यांच्या प्रयत्नातून १७ नंबरचा फॉर्म भरून रामूसिंग छोटी-मोठी कामे करून २००९मध्ये ५० टक्के गुण मिळवून दहावी पास झाला. त्याच्यातील शिक्षणाची ओढ त्याला गप्प बसू देईना. २०११मध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तो बारावी झाला. त्यानंतर कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन २०१५ला बी. कॉम पदवी घेतली.आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा...रामसिंग, भगवानसिंग आणि महेंद्रसिंग या आपल्या तीन भावांसोबत झोपडीत राहत असलेल्या रामूसिंगसह एकूण १५ जणांचे हे कुटुंब आहे. रामूसिंगच्या शिक्षणवेडामुळे त्याच्या भावांची चार मुलेदेखील सासवडला शाळेत जात आहेत. रामूसिंगने झोपडपट्टीतील अन्य कुटुबांनाही शिक्षणाचे महत्त्व सांगितल्याने सुमारे २० मुले सध्या शिक्षण घेत आहेत. रामूसिंग याचा भाऊ भगवानसिंग हा केवळ दुसरी शिकला आहे. शासकीय अनुदान, रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे समाजाने आमच्या जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा रामूसिंग आणि त्याचे कुटुंबीय करीत आहेत. भावांची पायपीट थांबवायचीय..सध्या रामूसिंग सासवडच्याच एका पतसंस्थेत काम करीत एम.कॉमचा अभ्यास करतोय. एम.कॉम पूर्ण झाल्यावर एखादी सरकारी नोकरी मिळून कुटुंबाला हातभार लावण्याची आणि आपल्या ३ मोठ्या भावांची पायपीट थांबवण्याची स्वप्ने सध्या तो पाहतोय...