शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

अण्णांच्या यात्रेवर अवकाळी संकट !

By admin | Updated: March 18, 2015 01:29 IST

किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़

पारनेर (अहमदनगर) : भूसंपादनाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून ३० मार्चपासून वर्धा ते दिल्ली काढण्यात येणाऱ्या किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेला शेतकरी, वाढते ऊन, गव्हाची काढणी व आदी कारणास्तव यात्रा रद्द करण्याबाबत ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यसभेत भूमी संपादन कायद्यावर काय निर्णय होतो, त्यानंतर जाहीर सभांबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. भूसंपादनाच्या विरोधात अण्णांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांना पत्र पाठविली आहेत. मोदी सरकारचा भूमी संपादन कायदा शेतकरीविरोधी असल्याचे सांगत देशभरातील शेतकरी संघटनांनी त्यास विरोध केला होता. अण्णांनी शेतकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. कायद्याविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनही केले होते. त्यानंतर वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्याची घोषणाही वर्धा येथील बैठकीनंतर करण्यात आली होती. मात्र राज्यसभेत भूमी संपादन विधेयक संमत झाल्यावर आंदोलन करता येणार नाही़, ही भूमिका अण्णांनी मांडली आहे. त्याचाच भाग म्हणून अण्णांनी राज्यसभेत विधेयक संमत होऊ नये म्हणून सोनिया गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांना पत्र पाठवून सरकारच्या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. काही शेतकरी संघटनांनी अण्णांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन अण्णांना पदयात्रेऐवजी मोठी शहरे, गावांमध्ये जाहीर सभा घेण्याबाबत सुचविले आहे. (प्रतिनिधी)च्अण्णांच्या कार्याने प्रेरित होऊन महाराष्ट्रासह विविध राज्यांतील दीड हजार युवक व ज्येष्ठ नागरिकांनी देशसेवेचे काम करणार असल्याचे शपथपत्र त्यांना दिले आहे़ मंगळवारी राळेगणसिद्धीत कार्यकर्ता शिबिर झाले. हजारे यांनी देशासाठी काम करणाऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय संघटनेची बांधणी करणार असल्याचे सांगितले़विचार सुरू किसान यात्रा रद्द करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भासह इतर राज्यांत पुढील दोन महिने कडक उन्हाळा असतो. काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या गव्हाच्या कापण्यांमुळे शेतकरी कामात आहेत. शिवाय राज्यसभेत विधेयकाचे काय होते त्यावरच आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.