शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईच्या रस्त्यावरील फेरीवाले हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 02:00 IST

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्याचा धडाका लावल्याने धसका घेतलेल्या फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुंबई : नवी मुंबई महापालिकेने रस्त्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्याचा धडाका लावल्याने धसका घेतलेल्या फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयानेही रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्यास महापालिकेला हिरवा कंदील दिला. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्यांवर अतिक्रमण केलेले ४५० फेरीवाले हटण्याची शक्यता आहे.नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याने त्याचा धसका घेत महापालिकेने नोटीस बजावण्यापूर्वीच नवी मुंबई हॉकर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती.सर्व फेरीवाले २०१४ पूर्वीपासून व्यवसाय करत असल्याने यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्याशिवाय फेरीवाल्यांना न हटवण्याचा आदेश नवी मुंबई महापालिकेला द्यावा, अशी मागणी संघटनेने याचिकेद्वारे केली आहे.यापूर्वी उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने नवी मुंबई महापालिकेला फेरीवाल्यांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. मात्र शुक्रवारी न्या. नरेश पाटील यांनी ही स्थगिती हटवत रस्त्यावरील सर्व फेरीवाल्यांना हटवा, असा आदेश नवी मुंबई महापालिकेला दिला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे नवी मुंबईतील ४५० फेरीवाल्यांवर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>रस्त्यावर गाडया आणि फुटपाथवर फेरीवाले... मुंबईकरांनी चालायचे कुठे?पार्किंगच्या जागेअभावी मुंबईत रस्त्यांवरच गाड्या लावण्यात येतात, तर दुसरीकडे फुटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण...मग मुंबईकरांनी चालायचे कुठे? श्वास घ्यायला शुद्ध हवाही उरलेली नाही, असे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुंबादेवी परिसरातील सुमारे ५० फेरीवाल्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर व्यक्त केले. मुंबादेवी परिसरातील ५० फेरीवाल्यांना महापालिकेने नोटीस बजावल्याने संबंधित फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेली ३० वर्षे याठिकाणी बसत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आपल्याला हटवू शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तर महापालिकेने या फेरीवाल्यांनी रस्ते व फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे म्हणत आपल्या कारवाईचे समर्थन केले. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेत उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाला संबंधित वॉर्डच्या सहायुक्तांना भेटण्याचे निर्देश दिले. तसेच ते फेरीवाले २०१४ पूर्वीपासून आहेत, याचे पुरावेही सहायुक्तांपुढे सादर करण्याचे निर्देश दिले.