शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

दिवाळीनंतर बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर हातोडा - राज्य सरकार

By admin | Updated: October 30, 2015 18:58 IST

राज्यातल्या बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर हटवण्याची कारवाई करण्यात येईल अशी हमी आज शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - राज्यातल्या बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर हटवण्याची कारवाई करण्यात येईल अशी हमी आज शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला २९ सप्टेंबर २००९ नंतर उभारण्यात आलेली बेकायदेशीर धार्मिक स्थळे पुढील ९ महिन्यांमध्ये हटवावीत असा आदेश दिला होता.
सप्टेंबर २००९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा व ती हटवण्याचा आदेश दिला होता. या संदर्भात राज्याचे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) श्रीहरी अणे यांनी दिवाळीनंतर ही कारवाई सुरू करून नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. 
भगवानजी रियानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. 
बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत सुस्पष्ट नीती ठरलेली असून यामध्ये नियमित करणे, स्थलांतरीत करणे व हटवणे या तीन बाबींचा समावेश आहे. राज्याने कशा प्रकारे कारवाई करावी यासाठी पालिका, जिल्हा व राज्य अशी त्रिस्तरीय समिती नेमावी अशी सूचनाही कोर्टाने केली आहे.
सात नगरपालिकांकडून आलेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ६३३६ बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. यापैकी २०७ नियमित करण्यात आली, १७९ हटवण्यात आली आणि तीन स्थळे स्थलांतरीत करण्यात आली.